Pages

Friday, December 31, 2010

पाठमोरी

पाठमोरी पाहुनी तिजला उभी माझ्यापुढे
ओढला गेलो कसा मजला कळेना तिजकडे
संमोहुनी जागीच मजला कापरे भरले तिथे
गोठलेल्या आसमंती वीज 'ती' देई तडे

केस होते लांब काळे गुंफली होती जुई
गंध दरवळता उसासे आतुनी सोडे भुई
हे कसे हुंकार होते की कुणाचे बोलणे
आणि मजला भासले होते शहारे जादुई

गौरवर्णी पावले होती तिची मऊ शेवरी
कोण ना मी पाहिली असली परी या भूवरी
डौल होता चालताना अन कमानी देह हा
वेड लावी या जिवाला, आतुनी जखमी करी

रानवेली गात होत्या गीत रातीचे जसे
धाउनी वारा कपारीतून शिळ घालीतसे
पाखरूही फडफडे चमकून तिजला पाहुनी
एक किंकाळी फुटे अन लांडगे वेडेपिसे

या अशा अंधार राती ही निघाली झरझरा
ती पुढे माझ्या नि मी मागे तिच्या आलो खरा
आसमानी चंद्र होता पाहताना नाट्य हे
तो मला सांगे ' भल्या , बघ लोभ हा नाही बरा.'

माझिया हातात नव्हते थांबणे आता मुळी
पाय होते चालले मागे तिच्या हिरव्या तळी
घेउनी ती जात होती मज कुठे बोलावया?
स्वागताला वाघुळे अन सर्प पायी सळसळी

शुभ्रवस्त्रा चालली होती कुणा वाडयाकड़े
दूरच्या काठावरी अन या तळ्याच्या पलिकडे
खोल जाता आतमध्ये शूळ उमटे बोचरा
अन तरंगे संथ पाण्यावर कुणाचे चामड़े

दूर दिसले लाल डोळे रोखताना मजवरी
श्वास माझे धडधडोनि  नजर होई घाबरी
हासती घुबडे फिरवुनी मान उलटी केवढी
दार वाडयातील मग जबडया प्रमाणे करकरी

आत जाता ऐकली मी हाक मंजुळ गोडशी
वाजुनी पैजण मला दावी दिशा जणु उर्वशी
अर्धमेले दार ढकलून मी जसा गेलो पुढे
आलिंगना होती उभी ती लाजुनी तेथे जशी

हनुवटी उचलून मी डोळ्यांत उतरून पाहिले
खोल गहिरे अन निळेसे जहर जैसे पाजले
लागलेले रक्त थोड़े लाल त्या ओठांवरी
दात विचकुन हासुनी मजला तिने न्याहाळले

ढकलुनी मजला ती माझ्या बैसली छातीवरी
रुतवुनी दातास मग घामेजल्या मानेवरी
उड़वुनी रक्ताळ चिळकांडया तशा अंगावरी
तडफडोनी शांत होता झोपली प्रेतापरी

आज पुन्हा पाहतो मी एक माझ्यासम उभा
वीजही होती तिथे करुनी किनारा वर नभा
रोखुनी डोळे उभा तो पाठमो-या तिजकडे
पाठमोरा मी तिथे होतो तिच्यासंगे उभा!!

------ आदित्य देवधर

Thursday, December 30, 2010

चूक झाली

सहन मी केले उन्हाला, चूक झाली
सावली झालो तुम्हाला, चूक झाली.

झेलताना गार वारे आणि गारा
पाजले पाणी तुम्हाला, चूक झाली

बंद करुनी वेदनांना खोल गात्री
'हासरा' दिसलो  जगाला चूक झाली 

खंत ना कुठली उराशी ना अपेक्षा 
कोरडे केले मनाला, चूक झाली

घातले पोटी चुकांना रोज तुमच्या 
दोष मी दिधले स्वत:ला, चूक झाली

भान ओवाळून उरलो देहमात्रे 
पारखा झालो जिवाला, चूक झाली

एकटा मी जागलो माझ्या प्रतिज्ञा 
देवही ऐसे म्हणाला 'चूक झाली'

तोंड वेंगाडून आला काळ जेव्हा
वाटले जगलो कशाला, चूक झाली.


------- आदित्य देवधर

Monday, December 27, 2010

तेवढे सांगा मला..

पाखरांनो दूर जा दाही दिशांना भोवताली
तेवढे सांगा मला माझी प्रिया कोठे निघाली

धाडली कित्येक पत्रे मारल्या कित्येक हाका
एकही प्रतिसाद ना आला,न कुठली हाक आली

एवढे का रागवोनी जायचे सोडून मजला
एवढी गे काय मोठी चूक मज हातून झाली

श्वास माझे भारले होते तिच्याशी बोलताना
वाहतो माझ्याच श्वासांची अता ओझी, हमाली

थांबती वाटा अताशा दूरच्या क्षितिजा तळाशी
वाट पाहूनी अता मनपाखरे थकली, निमाली

------ आदित्य देवधर

Thursday, December 23, 2010

मोजदाद

भाग, बाकी आणि हातचे,
चिन्हांसंगे संपुन जावे
देणा-याने देउन जावे ,
घेणा-याने घेउन जावे !

पाण्यासंगे वाहून जावे
ओलाव्यापरी राहून जावे
पावसामध्ये धुंद होऊनी
कणाकणाने चिंब भिजावे

कधी फुलावे झाडांवरती
कधी मंदिरातुनी जळावे
कधी झुरावे चातकापरि
कधी कोकीळेसवे रमावे

मोजदाद का निव्वळ कोणी
करे नभाची अन रंगाची
आयुष्याच्या नभात केवळ
आनंदाचे रंग भरावे

ओलांडुन उंबरा जगाचा
स्मृतींतुनी हृदयात उरावे
मायाभूमीतली माणके
जाता जाता ठेउन जावे.

----- आदित्य देवधर

Tuesday, December 21, 2010

नभ रडवेले

सवय एवढी झाली की
अश्रू विसरे रडणे
घन बरसावे तैसे केवळ
आनंदाने पडणे

कधी कुणाला वाटे ना
पाउस हा रडवेला..
अंधा-या रातीला मजला
रडताना दिसलेला

भिजतो मीही आसवांतुनी
बरसातीच्या संगे
रडता रडता घेता येती
भिजणा-याची सोंगे

रडणा-या आभाळाचे मी
गातो हिरवे गाणे
पाउस येथे सांडत जातो
मोत्या एवढे दाणे

'का रडतो बा मुक्या नभा तू'
प्रश्न तया मी केला
विजेएवढा तडा केवढा
नभातुनी चमचमला

'धरणी माझी सखी एकली
कुणी प्रिया ना मजला
क्षितीजाच्याही पल्याड माझ्या
प्रिय सजणीचा बंगला'

'इतुके धावून जातो तेथे
प्रिया मीलनासाठी
तितुक्या तितुक्या लांबत जाती
प्रेमळ भेटीगाठी'

फुटून येतो बांध शेवटी
पाउस येतो धाउन
निघून जाते मळभ तेवढे
अश्रूंमधुनी वाहून

थेंब थेंब मग भेटून जातो
धरती होते ओली
भाव दाटती रम्य मनोहर
उत्कट सभोवताली

अता उमगले गुपीत सारे
ढगाळल्या गाण्याचे
भिजता भिजता रडण्याचे
अश्रूंच्या हसण्याचे

व्याकुळलेले डोळे गाती
गाणे हे भिजलेले
श्रावणमासी बरसून जाती
नभ ऐसे रडवेले

----आदित्य देवधर

असे कसे जमायचे

कधीतरीच भेटते, उगा मला अव्हेरते
अशातही रुसायचे, असे कसे जमायचे?
असे कसे जमायचे?

तुझीच वाट पाहतो, तुझेच चित्र काढतो
उद्या तरी दिसेल ती, मनास रोज सांगतो
अशीच चित्रं काढुनी स्वप्न रंगवायचे
कितीक दीस जायचे, असे कसे जमायचे

तुझी न ये कधीच हाक पत्र ही कधी न ये
घरासमोर वाट पाहतो तुझीच गे सये
चुकून ना कधीच मान वेळवोन जायचे
किती ग भाव खायचे असे कसे जमायचे

नवे नवे गुलाब फूल काय ऐक सांगते
'फुलून येत पाकळी पाखरू शहारते
मधाळ स्पर्श गंध धुंद एकरूप व्हायचे'
तरी तुझे रुसायचे, असे कसे जमायचे

दमेल रात्रही अता रुसेल चंद्र चांदणी
झोपतील तारका थंड रुक्ष या झणी
अता तरी पुरे सखे नको नको म्हणायचे
मला अता तुझ्यासवे रमायचे रमायचे

------आदित्य देवधर

Monday, December 6, 2010

त्रिवेणी

आलो होतो कशास इकडे, सुखे भोगण्यासाठी?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी?
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी?

कितीक  येतील लाटा आणिक विरून जातील
बरीच वाळू काठावरची घेउन जातील
नव्या ओलसर अस्तित्वाला ठेउन जातील

रोज सकाळी वाट पाहतो मावळतीची
रात्र जागतो स्वप्नांमधल्या अंधाराची
तरी वाट संपत नाही, की रात्र संपत नाही

दिसते मजला रूप तुझे तु इथे समोरी नसतानाही
कुठे हरवतो मी माझा स्वत:च, कारण नसतानाही
बघ, तुझ्याच पाशी असेन मी, तू रडतानाही हसतानाही !

-----आदित्य देवधर

Friday, December 3, 2010

आठवतो मज..

आठवतो मज, अलगद प्रेमळ हात थोपटे पाठीवरती
स्पर्श तयाचे उब तयाची स्वप्नांच्या गावी मज नेती
डोळे मिटुनी शांत झोपता शिळ मायाळू मधुवंती
घालून जातो  एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज, बोट धरोनी पाय चालती वाट नव्याने
उंच भरारी मारत जाती पंख कोवळे क्षणाक्षणाने
वाट आडवी उडता उडता, कुणी शिकारी उगा दमाने
खोड मोडतो एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज कुशी एक मायेची मजला लपण्यासाठी
ठेच लागता, दुखता खुपता घरी येउनी रडण्यासाठी
फुंकर घालून जखमेवरती केवळ माझ्या हसण्यासाठी
पाय चेपतो एक विठोबा माझ्यासाठी आठवतो मज.

----आदित्य देवधर

मी अन् तू

आरशामध्ये मजला दिसलो मी अन् तू ही
एकटाच मग अपुला हसलो मी अन् तू ही

रोजरोजच्या रडगाण्याना बळेच चाली
लावत जाता हसलो रडलो मी अन् तू ही

एकटे कधी वाटे हृदयी, डोळे मिटता
चेहरा तुझा पाहून फसलो मी अन् तू ही

सावली कधी पळून जाता क्षितिजावरती
सावली तुझी होऊन बसलो मी अन् तू ही

पाठीशी हा उभा तुझ्या मी अन् तू माझ्या
तसे एकटे  पुरून उरलो मी अन् तू ही

आता मजला तुझियावाचुन करमत नाही
दर्पणातले नाते झालो मी अन् तू ही

---- आदित्य देवधर

Friday, October 29, 2010

मनातल्या मनात

मनातल्या मनात पावसास वाटले
ढगास बोलवोन कोसळून टाकले
उद्या कधी मिळेल मोकळे वहावया
म्हणोन आजच्या पुरात धाय मोकले

मनातल्या मनात चांदणे शहारले
निवांत शांत मंद रातिला किनारले
टिपून चंद्र ओघळून येत चंद्रिका
मनात कोप-यात प्रेमभाव दाटले

मनातल्या मनात रंग धुंद होऊनी
प्रकाशती मिळून कोवळ्या फुलांतुनी
झणी उभारली अजोड रंगसंगती
घरी बहार आणली तयांस चोरुनी

मनातल्या मनात सांजवेळ नांदली
दिशादिशांमधून प्रीत तार छेडली
समस्त प्रांगणी मधूर सूर भारले
तुला उभी स्वत: समोर धुंद पाहिले

मनातल्या मनात सागरा तुझ्यासवे
निघून दूर जायचे, जगायचे नवे
बुडून जायचे असेच खोल आतुनी
बघायच्या नव्या दिशा नि चेहरे नवे

---- आदित्य देवधर

Thursday, October 28, 2010

तुला काय त्याचे

मनी लाविले मी दिवे अत्तराचे तुला काय त्याचे!!
काळीज वाती जाळून सरलो तुला काय त्याचे!!!

जरी थांबलो मी तुला भेटण्यासी तरी तू न आली
कधी सांजवेळी, कधी भर दुपारी, घराच्याच खाली
भले भेटण्याचे तसे खेळ झाले मनाशी मनाचे
तरी जीव माझा तुझ्यापास धावे तुला काय त्याचे!!

किती धाडली मी गुलाबी गुलाबी पत्रे लिहोनि
कोरून सारे जीवाचे शहारे रडोनी रडोनी
किती पाहिले मी स्वप्नी उतारे तुझ्या उत्तराचे
जरी जाणले मी नकारास तुझिया तुला काय त्याचे!!

उरी गाळली मी किती आसवे  गे मलाही न ठावे
रडली फुलेही , सुकले पिसारे , झुरले पुरावे
वाहून गेले डोक्यावरोनी पाणी पुराचे
तरी थांबलेलो गाळातळाशी तुला काय त्याचे!!

शब्दांस माझ्या किंमत दिली तू कवडी पुरेशी
स्वप्ने उशाशी ओल्या कडांनी निजली उपाशी
तुझिया स्मृतींचे तांडे निघाले ढळत्या घडीचे
मीही निघालो प्रेमा उपाशी तुला काय त्याचे!!

---आदित्य देवधर

जळमटं

हळू निनावी फुंकर आली, थरथरली जळमटं
'कुणा स्मृतींची लागण झाली', पुटपुटली जळमटं

पल्याड भिंतीशी विणता मी अलगद काही जाळी
नवीन शेजारी आल्याने खुसखुसली जळमटं

उगीच गप्पा टाकत होत्या काही जुनाट गोष्टी
अजून गाठी जोडत जाता बजबजली जळमटं

असे  वाटले झाडून घ्यावी जून स्मृतींची नाती
'कशास भ्यावे अस्तित्वाला?' ओरडली जळमटं

विझून जाता कोप-यातली पणती एक बिचारी
कशी एकटी पडली आणि अवघडली जळमटं

कितीकदा तू येऊन गेलीस येथे समोर माझ्या
तुझ्याचसाठी अंधारातून तडफडली जळमटं

अशीच ये अन् घेऊन जा तू उधार काही धागे
मला म्हणाली 'अताच सारी आवरली जळमटं'

------आदित्य देवधर

Wednesday, October 20, 2010

प्रेम हे असं असतं

प्रेम हे असं असतं.... असं असतं....
फार वेगळं काही नसून
मनातल्या मनातलं हसं असतं

पुराच्या पाण्यात झोकलेलं असतं
कुणाच्या स्वप्नात पोचलेलं असतं
डोळ्यांच्या वाटेनं बोलता बोलता
मनातलं गुपित जोखलेलं असतं

शब्दांच्या धारांत भिजलेलं असतं
चंद्राच्या कुशीत निजलेलं असतं
अंधाराचा पडदा पडता पडता
मिठीतून अंतर विझलेलं असतं

मनाच्या मातीत रुजलेलं असतं
लाजाळु लाजाळु बुजलेलं असतं
थोडीशी उन्हं जादा होता
कोप-यात लपून रुसलेलं असतं

उंच झोक्यावर बसलेलं असतं
मातीच्या गंधातून ठसलेलं असतं
पावसाची एक सर कोसळता
दव मनभर पडलेलं असतं

प्रेम हे नसतंच कधी स्वत:चं
आयुष्याचं ते निरांजन असतं
मायेच्या तेलाने चिंब भिजून
देवाच्या समोर जळायचं असतं

प्रेम हे असं असतं ..... असं असतं!

-------- आदित्य देवधर

Monday, October 18, 2010

बंदिवान

स्वातंत्र्याच्या आकाशातील मेघ बंदिवान मी
कोसळणा-या धारांच्यातील रेघ बंदिवान मी

पळता पळता अनोळखी वाटांच्या मागे इथे तिथे
अडखळत्या पायांच्यापाशी वेग बंदिवान मी

तू विरहाच्या चौकटीतुनी कोंडलीस वेदना 
लुसलुसणारी तारुण्याची शेंग बंदिवान मी

कितीक वर्षांनी दिसला मज तेजस्वी दिवा कुठे
उरात केली प्रकाशणारी भेग बंदिवान मी

अंतर राखून राहिलास तू प्रेमाच्या ओळींवरती
सोडूनिया हा समास झाले  रेघ बंदिवान मी

-------आदित्य देवधर

Friday, October 15, 2010

बघ तुला भेटायला कोण कोण आलय


बघ तुला भेटायला कोण कोण आलय
चेह-यावरचं सूत अगदी मऊ मऊ झालय

फक्त एवढे जाता जाता घेउन जा तू
हास्य  बापुडे केविलवाणे रडून आलय 

उगीच  दिसती अनोळखी चेहरे कितीसे
हिशेब सारे आता चुकते करून झालय 

इथे येउनी पहा जरासे सभोवताली
आनंदाच्या वाटेवर अश्रूंचे आलय 

चिंब केवढे ह्रदय दाटले तुझे अचानक
अशा कोणत्या आठवणीच्या तृषेत न्हालय? 

कोप-यातुनी उभी एकटी तिला पाहुनी
ऊर भरोनी काळजीतुनी उगाच भ्यालय!

आज शेवटी गुदमरलो मी फुलात राहून 
कधी एकदा  सरणावरती जातो, झालय.


-------आदित्य देवधर 

Wednesday, October 6, 2010

एक झाड

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

एक झाड मी होतो बहुधा माझ्या गेल्या जन्मी
किती झेलल्या गारा,  किती सोसली गर्मी
देत सावली उभा राहिलो येथे मरेपर्यंत
एक एक अवयव दिधले सरपण जमेपर्यंत
जळलो मीही तसा शेवटी एका साधुसंगे
राखेतूनही सोने घेण्या जमले कितीक भुंगे

देह जळाला तरी तेथला साधू संपला नव्हता
तेजाळ ओंजळीतुनी तेवढा तिथेच उरला होता
हात जोडूनी वदला सस्मित साधू नम्रपणाने
'भाग्य थोर लाभले केवढे तुझ्यासवे जळण्याने
मोक्ष गती प्राप्तीस साजसा कर्मयोग तू जगला
घे वर मागून वृक्षराजसा काय हवा तो तुजला'

समईने वातीस केवढा सन्मान दिला होता
जळण्याच्या संज्ञेस केवढा अर्थ दिला होता
माणूस होउन जगण्याच्या मग इच्छा दाटुन आल्या
नम्र झुकुनी साधूपुढती अशा मागण्या झाल्या
'एकदा तरी मनुष्य व्हावे असे करावे खास
छायेखाली बसुनी मजला घेता यावा श्वास'

जन्म अखेरी मला लाभला एका थोर कवीचा
शब्दांच्या सागरात डुबक्या मारून अवखळण्याचा
झाडे पाने फुले उतरली शब्दांमधुनी थेट
वेळोवेळी सृजनासंगे घडली त्याची भेट
जगला सारे आयुष्यातील आनंदाचे क्षण तो
अन् अचानक वरच्या दारी जाण्यास बुलावा येतो
अखेरच्या श्वासाची होती  एकाच इच्छा त्याची
छायेमध्ये झाडाखाली राम राम म्हणण्याची
सुचती त्याला काही ओळी जगास देण्यासाठी
येणा-यांनी  जाण्यासाठी, जाण्या-यांनी येण्यासाठी

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

------- आदित्य देवधर

Tuesday, October 5, 2010

भ्रम

फूल एक वाटेवरले, गळून गेले
बंध दोन धाग्यांमधले
, जळून गेले

यातना भ्रमाची हसली उगीच जेव्हा
दु:ख तेच हास्यातून विरघळून गेले

दार बंद होताच उद्याचे उजाडणारे
वादळी नशेचे संकट टळून गेले

पाय देत शब्दांवरती येता जाता
अर्थ मोकळ्या आभाळी मळून गेले

थोर चोर अध्यात्माची घेती शाळा
हेच शेवटी म्हातारे चळून गेले

घाव घालुनी पाठीवर फितूर गेले
रक्त केवढे कडवे भळभळून गेले

भावशून्य गाण्याच्या मैफिली जमवता
सूर आतले दु:खी कळवळून गेले

-----आदित्य देवधर

असावीस तू जवळी

पावसाचा पडदा छेडून लहरत येता वारा
लाटा अवखळ पडद्यावरती झिम्मा धरती न्यारा
तुषार भरती आनंदाची स्वप्नांमधली तळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

पुसती मजला थेंब थेंब हे कुठे हरवले रंग
इंद्रधनुही अवघडलेले, अजब तयाचे ढंग
रंगप्रभाही उतरू लागे
गात्र गात्र ओले अन जागे
कोकिळही मग गाउ लागे तृषार्त ओल्या गळी


एक एक थेंबावर मजला कितीक सुचती गाणी
शब्दांचाही पूर जाहता अडखळते हृद वाणी
ताल धरूनी पानांवरती
सूर वेचुनी गाउन जाती
कोमेजून रडवेल्या माझ्या स्मृतींतली हर कळी

ओघळते संदर्भ न जाणो कुठून येती दारी
सुंदर वळणे घेउन देती नवी नवी खुमारी
अशाच एका वळणावरती
आठवणीही वाट पाहती
कधी पडावी गालावरती गोड गुलाबी खळी
वाटे गुंफून जावे तुझिया हातांमधुनी गळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

-----आदित्य देवधर

Saturday, September 25, 2010

आनंदी क्षण


मातीत एक थेंब
पडताच दिला सांगावा
भारलेल्या चैतन्याचा
भविष्याच्या अस्तित्वाचा

डोळ्यांत एक थेंब
मिटलेल्या पापण्यात दडला
दडपण सरल्याची भावना
दाटून म्हणाली जरा थांब ना
असा ओघळू नको लगेच
थोडा धीर धर
तुला संधी मिळणार आहे
हासत हासत ओघळण्याची
तू हसताना येण्यासाठी
जन्माला आला आहेस
शेजारचं एक स्वप्न बघ
तिथेच वाढीला लागलंय
त्यालाही तुझी सोबत
आणि तुला त्याची
अस्तित्वाची सान्निध्याची

तू रुजायला लागशील
मिळेल ओजाचं पोषण
एक हिरवा अंकुर फुटेल
या अंकुराच्या दृष्टीने बघ जरा
सगळे तुला बघायला आतुर
हसून, उत्साहाने, चैतन्याने
त्यांच्या ठायीही तुला दिसेल
डोळ्यांत एक थेंब
आकार घेताना
आनंदी क्षणासाठी जन्माला आलेला

-------आदित्य देवधर

मालकीण

        आमच्या मालकीणबाई म्हणजे तसं फार मोठं प्रकरण! प्रगल्भ आणि तेवढंच गूढ. उदात्त आणि तेवढंच विक्षिप्त. कामाचा प्रचंड उरक आणि पुढच्या कामांसाठी सदैव तयार. फार मोठा पसारा सांभाळतात. म्हणजे मला जो माहीत आहे तो मोठाच म्हणावा लागेल. माझ्यासारख्या ब-याच जणांची जबाबदारी त्या लीलया पेलताहेत. म्हणा मला दुसरा काही पर्याय नाहीये पण अशा सगळ्यांनाच त्यांनी आपल्या छायेखाली आश्रय दिला आहे. स्वत:च्या आणि आमच्या कामांचा रगाडा हाकताहेत. रोज त्यांचा दरबार भरतो. आम्हाला कधी जावं लागत नाही तिथं, पण तिथेच सगळे हिशेब चालतात. त्यांचा एक हसबनीस  आहे. फार चतुर आणि कर्तबगार. त्याला सगळं येतं. तो सगळ्यांचा नियमाप्रमाणे चोख हिशेब ठेवत असतो. बिनचूक अगदी. बोट ठेवायला जागाच नाही कुठे.

       बाईंनी आम्हाला आमची कामं अगदी सुरुवातीपासूनच वाटून दिली आहेत. कामाप्रमाणे मोबदला मिळावा ही साधी अपेक्षा आहे की नाही? पण तसं होत नाही. त्यांच्या कारभाराविषयी मला फार माहिती नाही. पण जरा अगम्य आणि विचित्र आहे. मी थोडा शोधण्याचा प्रयत्न केला पण 'अपने बस की बात नही' हे कळल्यावर नाद सोडून दिला. मोबदला आणि काम यांचं गणित काही जुळत नाही. तो हसबनीस  काय करतो कुणास ठाउक. दाद मागायला गेल्यावर अशी काही समीकरणं मांडून दाखवतो की घेरीच यावी सोडवता सोडवता. तरी माझ्या एका मित्राने तसं प्रयत्न केला होता. पण समाधान न झाल्याने बिचारा तसाच राहिला. मोबदला तर दूरच अजून गाडाभर कामं मागे लावली.

        मला त्या फारशा आठवत नाहीत. कशा दिसतात कशा राहतात , माहीत नाही. पण त्यांची खूप रूपे असावीत. एवढी कर्तबगार प्रतिमा.. एक थोडच असणार आहे? मग मी त्यांना काळ्या डगल्यात, कधी श्वेत वस्त्रात कधी आईच्या रूपात तर कधी मायेच्या रूपात कल्पित करतो. त्यांना कधी बघायला मिळेल असं वाटत नाही. एकदाच कधीतरी फार पूर्वी त्यांना भेटल्याच पुसट आठवतंय. पण ते अगदी त्यांच्याकडे काम सुरु करण्यापुर्वी. बराच काळ लोटला आहे त्याला. मलाही आता सांगता येणार नाही. आमचा काय कामापुरता संबंध. कामं आली की ती संपवायची. दुसरी कामं तयारच असतात. यातून सुटका नाही. मला तर वाटतं की गेल्या आणि त्याआधीच्यांही जन्मांमध्ये हीच बाई असणार मालकीण म्हणून.

        परवा एक विलक्षण गोष्ट घडली. देवाकडे गेलेलो. ८० वर्षांनी गेलेलो. ब-याच गप्पा झाल्या. अन् अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या. त्यांची बोलणी सुरु झाली देवाशी. त्यातली एक अत्यंत तेजस्वी स्त्री होती. आणि एक करारी पण अत्यंत वृद्ध असा पुरूष होता. मला उगाच आमच्या मालकीण बाईंची आणि त्या हसबनिसाची आठवण झाली. असेच दिसत असतील ते ..मी मनात म्हणालो.उगाच हसू आलं. रिकाम्या वेळी मनाचे घोडे कुठेही पळतात. असो. इतक्यात देवाने मला हाक मारली....
'वत्सा..... यांना भेट. यांच्याच सांगण्यावरून तुला पुढची कामगिरी देत आहे. बोलून घे एकदा'
मी चपापलो. माझी अवस्था ओळखून देव म्हणाला.
'तू ओळखत नाहीस? अरे ही नियती आणि हा निसर्ग.....!!! हीच तुझी मालकीण आहे आता.'

----- आदित्य देवधर

अस्तित्वाचे ऋतू

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती
मनीचे ऋतू बदलले किती

रंगांचाही जन्म इथे जाहला
असंख्य छाया , गूढ छटांचा अर्थ इथे लागला 
तेजामधुनी मिसळून जाती
हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या
हृदयामधल्या भरकटलेल्या अंधारातील गती
छटेचे ऋतू बदलले किती

रिमझिमती, धारा कोसळती 
आरशामध्ये अवघडलेल्या सरी धरेवर कोसळती
काळ्या चष्म्याआतून धारा
रंगीत  गाणी गाऊन जाती
कुणास स्मरती नाजूक साजूक ओघळती
सरींचे ऋतू बदलले किती

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती

------- आदित्य देवधर 

चुका

मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या
सह्या प्रशस्ती पत्रांवरती उगाच झाल्या अमुच्या

ओरडताना देठातून आवाज बिचारा बसला
बडवून एकच बाजू अमुचा डग्गा पुरता फुटला
मैफिली समेशी धडपडणा-या सुन्याच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

झिंग एवढी चढली की दिवस रात्र उमगेना
अस्तित्वाच्या ऋतूंबरोबर घासाघीस जमेना
तोल सावरता सावरता नशाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

पेल्यांमधुनी पिता पिता लाव्हाही डचमळला
उष्ण उष्ण वाफांच्या खाली कोणतरी तडफडला
कारण वणव्यालाही साध्या चुळाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

एक शूळ उमटला कोठे मातीत घराच्या अंगणी
उघड्या जखमा अंगावरती अंत:करणी दुखणी
दवा औषधी मर्दुमकीच्या पुचाट ठरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

धडधडणा-या हृदयामध्ये देव पाहिला आम्ही
लटपटणा-या पायांना आधार जाहलो आम्ही
अश्रद्धांचे श्राद्ध घालण्या मुठीच पुरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

----- आदित्य देवधर

Friday, September 3, 2010

जगून घे

आता जरासे हसून घे
श्वासांस थोडे जगून घे

जाता निघोनी लवाजमा
मागून त्यांच्या रडून घे

मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे

क्रांती जिथे पेटुनी उठे
ज्वालांत तेथे जळून घे

जाशी करायास सांत्वना
थोडे स्वत:चे करून घे

स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे

आता कितीसे जगायचे
पुन्हा नव्याने मरून घे

प्राणांस त्यागून शेवटी
वाटेल तैसे जगून घे

-----आदित्य देवधर

गोडवे गाऊ कुणाचे

गोडवे गाऊ कुणाचे, गीत आसुसल्या मनाचे

रेशमाच्या पालवीचे, गार हिरव्या सावलीचे
कोवळ्याशा सायलीचे, चाफयाच्या बाहुलीचे
मायभोळ्या माउलीचे, सोहळ्याच्या चाहुलीचे
देवळाच्या पायरीचे, धावणा-या शेवरीचे
शांतणा-या भैरवीचे, मुग्ध कर्णी बासरीचे
कोरलेल्या कोयरीचे, कुंकवाच्या सोयरीचे
पौर्णिमेच्या चांदण्याचे, ज्ञानगंगा वाहण्याचे
उंच उंची नारळीचे, सागराच्या मासळीचे
निर्झराच्या गारव्याचे, संधीकाली मारव्याचे
डोलणा-या केशराचे, कूजणा-या पाखराचे
गोडवे गाऊ कुणाचे खेळ सारे या मनाचे

मोकळ्या मऊ कुंतलाचे, गौरकांती सुंदराचे
नीलकमला डोळियांचे,अन गुलाबी पाकळ्यांचे
कर्ण भूषण लोलकांचे, शांत रेखीव काजळाचे
खळखळोनी हासण्याचे, वेळवोनी पाहण्याचे
काननी मृग चालण्याचे, कोकिळेच्या बोलण्याचे
डौलदार आलिंगनाचे, प्रेमस्पर्शी चुंबनाचे
वाट माझी पाहण्याचे, थेंब काही गाळण्याचे
भेटण्याच्या कळकळीचे, अंतरंगी धडधडीचे
थांबलेल्या क्षणभराचे, संपलेल्या अंतराचे
प्रेयसीच्या संगतीचे मोहवेड्या रंगतीचे
गीत धुंदी यौवनाचे, गोडवे माझ्या प्रियेचे

----- आदित्य देवधर

Tuesday, August 31, 2010

आनंद-पालखी

माझ्याच सावलीचे रे झाड लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

आयाम लाभले रे नवरूप चेतनेचे
दृष्टांत जाहले रे सृजनक्षम कवीचे
गाणे सुखावणारे हलकेच ऐकिते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

अमृत तेज लाभो ज्योतिर्मयी प्रकाशी
शक्ती उरी शिवाची लक्ष्मी वसे कराशी
दुर्गेस प्रार्थनेचा नैवेद्य दाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

बरसात धुंद होता न्हाऊन चिंब झाले
श्वासात ओजसाचे दैवी सुगंध आले
बागेतल्या कळ्यांशी लाडीक बोलते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

डोळे मिटून कल्पे हर एक त्या क्षणाला
आभास गोड मोठे ओवाळती स्वत:ला
मायेत चिंबलेली दिपमाळ लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

भिजताक्षणी फुटावी नवपालवी मनाला
हिरवे निळे उडावे रावे क्षणाक्षणाला
स्वप्ने अमूल्य काही स्वप्नात पाहते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी


------- आदित्य देवधर

काय हे अमुचे जिणे!

रोज यंत्राच्या प्रमाणे मानवी कळ दाबणे
पावलीच्या चाकरीचे काय हे अमुचे जिणे!
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

रातिचे अवघे करोनी सोहळे, जलसे असे
चांदण्याचीही इथे जंगी निलामी होतसे
सूर्यही झाके स्वत:ला पाहुनी हे वागणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भोवतालीची अधाशी पाशवी वृत्ती सले
झापडा बांधून डोळा चालतो आम्ही भले
जाहले वणव्यातले अमुचे खुळे बुजगावणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

आसवांनो दूर व्हा डोळ्यांकडे फिरकू नका
ओघळायाचे भुलोनी आतुनी रडणे शिका
येतसे आम्हा गिळोनी आसवे अमुची पिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

सांत्वनाचे शब्द आम्ही चार मोठे जाणतो
टचकनी डोळ्यांतुनी पाणी पुरेसे आणतो
विकुनिया या भावनांना पळभरी कुरवाळणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

स्वार्थ केवळ राहिले येथे भल्या नात्यांतुनी
मित्र सारे शोधलेले फायद्याचे पाहुनी
साचली खाती पुरेशी, प्रेम मायेचे उणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

मूठभर ती माणसे होती जयांना भ्यायलो
मान तुकवोनी उभे आम्ही कडेशी राहिलो
घेतले शिक्षण अशा शाळेतुनी शिकलो भिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भूक होती पेरली येथे सुखाच्या भोवती
केवढी हाडे इथे नरकात पोटे जाळती
बापडे मश्गूल आम्ही येथ भरण्या बोकणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

'उडवतो गाड्या जराशा काय या अमुच्या चुका?
चोचले पुरवू जिभेचे भागवू अमुच्या भुका
काच खाली घेउनी देतो गरीबाला चणे'
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

वस्त्र लज्जा झाकण्या पुरते कुणा ना सापडे
मोजुनी पैसे हजारो होत कोणी नागडे
फाडती कपडे नव्याने 'ते जुने होते' म्हणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

एकही आवाज येईना जरी मी बोललो
आग पेटवण्या कधी ठिणगी इथे मी जाहलो
विझवुनी तिजला दिले हाती जुनेसे तुणतुणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

--------- आदित्य देवधर

Monday, August 30, 2010

पाउस येता....

येता पाउस दाटुनी तममयी आभाळ हो जाहिले 
मृद्गंधी दव न्हाउनी कवडसे क्षितिजावरी पाहिले
धारा कोसळूनी उडे चहुकडे आनंद हृदयातुनी
शालू नेसून गार गार हिरवा धरती सुखाने डुले

ओला चिंब झरा पडे उसळुनी खाली प्रपातातुनी
मोत्यांची बरसात झेलून कुणी नाचे तुषारांतुनी 
थेंबांच्या जणु आरशातुन बघे रंगीत नवसुंदरा 
नवलाई डवरून अंगावरी तेजाळ कांती फुले

गारा वेचुन डोलुनी मयुर हा शोभे विहंगाग्रणी 
वाटा काढुन धावती शतमुखी फेसाळ सा-याजणी 
नाजुक नाजुक पान पान थिरके वा-यास बोलावुनी
रत्नांचे कित्येक घड इथे लडिवाळ रेंगाळले 

धारांचा रचुनी सुरेल मुखडा मल्हार आरंभिला 
अस्मानी धून जादुई मदभरी छेडून नभ डोलला 
ताना घेउन वीज कडकडकडे थाटात षड्जावरी
टाळ्या वाजवुनी नभी गडगडे कुंभात जल सोहळे 

डोंगरवट कुरवाळती घन-धुके होई प्रभा धूसरी 
गालीचा मऊ रेशमी पसरला वाटे जणू भूवरी 
पडदा ओढुन थंडिचा लपतसे यौवन हिरवे निळे 
करती किलबिल पाखरे सभवती आनंदरस ओघळे

--------- आदित्य देवधर 

Wednesday, August 18, 2010

पानिपत

     
       विश्वास पाटील यांचं 'पानिपत' वाचलं. त्यावर काही लिहिल्याशिवाय रहावत नाही. कायमचा लागलेला डाग, सततची बोच, गेलेला विश्वास, झालेली हानी..!!! सगळं काही परत न मिळवता येण्यासारखं. पानिपत जनमानसात एवढं कोरलं गेलंय की पानिपत आणि  'वाताहात', 'दाणादाण' वगैरे शब्द समानार्थी वाटायला लागतात. 'पानिपत झालं' एवढ्यातच काय ते कळुन चुकतं. एखादी घटना, स्थळ एवढं रुजावं की वाक्प्रचारासारखं वापरलं जावं, ही काही साधी गोष्ट नव्हे. पानिपतला सदाशिवराव  काय एका महिन्यात हरले नाहीत, ती बरीच मोठी 'पुण्याई' होती. रघुनाथराव अटकेहून परतल्यानंतर पेशव्यांच्या दशा काही चांगल्या नसाव्यात. जरीपटका अटकेपार लहरून आला पण त्याने मिळालं काय तर कर्ज आणि अंतर्गत दुही. पराक्रम झाला खरा पण त्याचं सत्तेत रूपांतर झालं नाही. एवढा मोठा इतिहास घडवताना पेशवे राजनैतिक महत्वाकांक्षा दाखवण्यात कमी पडले, असं मला वाटतं. दिल्ली काबीज केल्यानंतर बाद्शाहापादाची सूत्रे हाती घ्यायच्या ऐवजी आम्हाला त्यांचे रक्षणकर्ते होण्यातच धन्यता वाटली. पानिपताची कारणे आणि परिणाम हा आपल्यासारख्यांसाठी एक धडा आहे. गेल्या कित्येक पिढ्या लोकं डोळ्यांच्या कडा ओलावून पानिपत सांगत आहेत, ऐकत आहेत. पानिपताचे  परिणाम आपण अजूनही भोगत आहोत . खरं तर या पराभवातून खूप शिकण्यासारखं आहे. किती शिकलो माहित नाही. काही कारणं, ज्याला घोडचुका म्हणता येईल, अशी काही नमूद करण्याचा माझ्या परीने केलेला प्रयत्न. 
         पानिपताच्या आधीच दिल्ली मराठ्यांच्या पायाशी लोळण घेत होती. तिथला बादशाहा फक्त बाद होणं बाकी होता. त्यावेळीच मीरबक्ष  नजीब आणि तमाम सुभेदारांना देहदंड करून किंवा मांडलिक होऊन राहण्याची आज्ञा करण्या ऐवजी मराठे तहास तयार झाले. मिळालेला मामुली मान, तूट भरून काढता येईल इतपतच खजिना आणि फुटकळ किताब आणि सुभेदारी याच्या मोहापायी त्या धूर्त नजीबाशी केलेला तह हा कुठल्याच राजकारणी मुत्सद्द्यास शोभणारा डावपेच नव्हता. त्याचवेळी रघुनाथरावांनी बादाशाहापादाची सूत्रे हाती घेउन तो नेहमी छत्रपतींच्या सेवेत राहील अशी हमी किंवा तरतूद केली असती तर काय बिशाद होती त्या पठाणांची की त्यांने हिंदुस्थान च्या दौलतीकडे डोळे वर करून बघावं! शिवाजी महाराजांची १०० वर्षांपूर्वीची ----' अटक ते कटक आणि काश्मीर ते सिंहल प्रांतापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा '--- त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवली असती तर पेशवा फक्त पुणेरी उरला नसता तर हिंदवी झाला असता. हिंदुस्थानातील रहिवाशांचच या पवित्र भूमीवर राज्य उदयाला येताना दिसलं असतं.
        सगळं शौर्य, पराक्रम एका बाजूला आणि अंतर्गत कलह एका, अशा तराजूत कलहाचं पारडं जड झालेलच बघायला मिळेल. मराठ्यांच्या बाबतीत तर जास्तच. शिवाजी महाराजांनीही हे खूप भोगलं. तत्कालीन राजघराणी आणि सरदारांमध्ये असे बरेच कलह होते. हेवेदावे होते. त्यातूनच सुरु झालेल्या राजकारणी खेळ्यानी घात करायचा तो केलाच. पानिपत याला अपवाद नाही. अहो, आमचा शत्रू निदान धर्माच्या नावाखाली एकत्र येतो हो..!! आम्ही तर भाषा, प्रांत, धर्म या सगळ्याबाबतीत एकच  होतो. पण तरी निरनिराळ्या कारणांसाठी एकमेकांवर खार खात राहिलो. जात-पात, वर्ण भेद वारसा हक्क, सुभेदारी अशा नाना भांडणांनी मराठयांची भक्कम तटबंदी वेळोवेळी खिळखिळी केली आहे. त्यासाठी कुठली मुलुख-मैदान लागली नाही. इतर सरदारांपेक्षा आपलं महत्व जास्त असावं म्हणून काय काय कारस्थानं केली असतील! किती जीव अशा चढाओढी मुळे खर्ची पडले असतील!! होळकर जर वेळीच शिंद्यांच्या मदतीला गेले असते तर दत्ताजी सारखा मोहरा मराठ्यांना गमवावा लागला नसता.
        नजीबाने मराठ्यांची तत्कालीन राजनैतिक परिस्थिती योग्य ओळखली होती. थोरल्या बाजीरावांबरोबरीने घोडी उधळलेली सरदार मंडळी आता जुनी झाली आली होती. सैन्याचे लगाम आता नव्या दमाच्या रक्ताच्या हातात होते. अर्थात या बुजुर्ग मंडळींचे केस जरी पांढरे झाले असले तरी तरी तलवारीची रक्ताची तहान मात्र तशीच होती. परंतु वाटाघाटी आणि डावपेचातलं महत्व मात्र कमी झालं होतं. हे नेमकं हेरून नजीबानं मल्हारबाबांकडे आश्रय घेतला. अर्थात मल्हारराव त्याला सामील नव्हते. परंतु जिथे मुळात ज्याला ठेचायला हवा होता, त्याला दूध पाजणं चाललं होतं. इकडे मराठे नजीबाला धरण्यास राती जाळत होते, आणि नजीब मल्हाररावांबरोबर त्यांच्याच डे-यात भीक मागायचं नाटक खेळत होता. जर मल्हारराव त्याचे डाव हेरून त्याला जेरबंद करण्यात यशस्वी झाले असते, तर पुढचा इतिहास वेगळा झाला असता.
       अब्दाली दिल्ली जिंकायला परत येणार हे कळल्यावर रघुनाथ राव स्वत: उत्तरेकडे निघावायास हवे होते. पण तिथेही भाऊबंदकी नडली. तुलनेने कमी चढाया केलेले सदाशिवराव आणि कोवळा विश्वास यांच्यावर एवढी मोठी मोहीम सोडून रघुनाथराव पुण्यात गाद्या गरम करत बसले. एवढा शूर माणूस पण बायकोचा धूर्तपणा आणि सखाराम बापूंच्या लबाड पणामुळे त्यांनी तलवार म्यानात घातली. तीच जर पानिपतात तळपती, तर पानिपत पठाणांचे झाले असते आपले नाही. कर्तृत्व   युद्धात असो किंवा राजकीय कारभारात असो, मोल कमीजास्त याने ठरत नसतं. पण कारभा-यांनी युद्धात हिशेब मांडणं किंवा शूर सेनापतीने दप्तरीत जमाखर्चाचा ताळमेळ घालणं याला कुठला न्याय समजावा?
       सदाशिवराव मोठ्या फौजफाट्यासह उत्तरेच्या मोहिमेवर निघाले. फक्त फौज नाही तर निम्मं पुणं घेऊन निघाले. बाया-बायका, त्यांचे दास दासी व नातेवाईक , यात्रेकरू, ब्राह्मण, कितीतरी भाट आणि हुजरे असे कितीतरी. एवढा लवाजमा घेऊन जायची गरज ती काय. यांच्या सुरक्षेविषयी थोडाही विचार डोक्यात  आला नाही?. जरी 'खाशा' नी हट्ट केला तरी योग्य-अयोग्य उमजून पावलं उचलायला नको होती का पेशव्यांनी? राज्य चालवायला शिरावर घेतलेली जबाबदारी अशा हट्टापायी विसरायची? यामुळे झालं असं की आपला पडाव योजनेच्या मानानं दोन दोन महिने उशिरा पडायला लागला. चार महिन्यांची मोहीम ८-९ महिने लांबली. हा वाढलेला खर्च कुठून भरून काढणार होते? लुटून? तेच करावं लागलं शेवटी. मूळ उद्देश बाजूला ठेउन लूट करायाला गेलो आहोत आम्ही असा झालं. चुकलंच पेशव्यांचं!
       जर सदाशिवराव आणि तमाम दिग्गज आपलं हेर खातं चोख राखते, तर कदाचित युद्ध पानिपतात झालंच नसतं. दिल्लीजवळ अब्दाली यांच्या पापण्यां खालून अलगद आपलं सैन्य घेऊन अलीकडे येतो आणि आम्हाला काळातच नाही. कळतं ते समोर आल्यावरच! शिवाजी महाराजांनी ज्या हेर खात्यामुळे कित्येक कठीण प्रसंगी बाजी मारली आहे,शत्रूला हातावर तुरी दिली आहे ते खातेच मुळी नव्हते इथे! ऐनवेळी समोर आलेला शत्रू पाहून देखील एक वेळ अशी होती की आपण जिंकलो असतो पण नियतीला हे मंजूर नव्हतं. तिथेही आपण आपल्याच लोकाना नीचा दाखवायला गेलो आणि घात झाला. इब्राहीम गार्दीच्या तोफा अब्दालीची अक्षरश: चाळण उड़वत होत्या. पण गार्द्याला मदत करण्याऐवजी आपले काही शहाणे सरदार मधेच उभे ठाकले. शत्रु कोण अणि मित्र कोण अशी परिस्थिती असताना मित्रच शत्रु म्हणून समोर आला. तोफा शांत करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे अब्दालीने डाव साधला. त्याच्या तोफा धडाडल्या आणि अवघ्या काही घटिकात मराठ्यांना  पळता भुई थोड़ी  केली. पठाणांनी झाडून सगळ्यांना कापला(जे पळून आले त्यांचा अपवाद सोडून). हिरवे झेंडे फडकवून, भाल्याच्या टोकावर मुंडकी नाचवून हिंसेचा नंगा नाच केला पठाणांनी. कोणालाही सोडलं नाही. नाव, पैसा, वेळ, ताकद, मुलूख सगळं धुळीत मिळालं. पुणं तेव्हा खूप भेसूर रडलं असेल.एक एक किंकाळी घराघरातून घुमली असेल. एक एक वीट हादरली असेल.
          एवढं सगळं होउनही आपण यातून शिकत नाही. राजकारणी सोडा हो पण अगदी तुमच्या आमच्या सारखी सामान्य लोकंही पुन्हा पुन्हां त्याच चुका करतो आहोत. वर दिलेली आणि अशी अजूनही कारणं असतील यामागे. मी केवळ एक पुस्तक वाचून केलेला हा उहापोह कोणाला चुकीचा वाटू शकतो. याला इतर आयामही असू शकतात. पण ही  कारणं  मात्र चुकीची नाहीत. आणि ती समजून आणि सुधारून आपण अजूनही काही घरगुती, कौटुंबिक, सामाजिक पानिपतं टाळू शकतो असं  मला वाटतं.



(कोणास काही गैर वाटल्यास दिलगीर आहे. तपशील चुकीचा असल्यास जरूर कळवावे.)

------आदित्य देवधर

Thursday, August 12, 2010

निराशा

आटला आहे किनारा आटली हर एक आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा
 
बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा
 
सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा
 
खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'
 
दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
 
-----आदित्य देवधर

Tuesday, July 20, 2010

आहुती

हसली शलाका आभाळ भरून
वारं  गार गार  परते फिरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

तहान थिजून अडके घशात
थंडगार चूल घरात घरात
नजर भकास आसवे गिळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

उपाशीच श्वास उपाशी कपास
कोरडा कोरडा उपाशी प्रवास
उपाशी धरती रडते बघून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

फुलातून मध मिळेना चाखाया
पानेही लागली मरून पडाया
झाड झाड उभे गळून गळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

पाखरं किंकाळी फोडून रडती
दिशा स्तब्ध सा-या हेलावून जाती
ढगासही वाटे फुटावे वरून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

माय माझी माती अताशा थकली
भूक अनावर होउन फाटली
दिसे कलेवर भेगाभेगातून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

आहुती यज्ञात माणसांची माझ्या
अभिषेक केला आसवांनी माझ्या
वणवा बळींचा पाहतो तुटून
थकलेलं पाणी डोळ्यांत भरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

-------- आदित्य देवधर

Friday, June 25, 2010

तिचं हसणं.....

तिचं हसणं, तिचं रूसणं...
सारं सारं आठवतय
मन झुरणं, खळीत रुतणं...
अजूनही सावरतय

तिचं असणं , मला पुसणं
स्मृतींमधून  वावरतय
केस उडणं,  ते  सावरणं
डोळ्यांपुढून झरझरतय

तिचं वळणं, तिचं बघणं
श्वासांनाही  दमवतय
तिचं बोलणं, तिचं ऐकणं
दु:खालाही शमवतय

तिचं लाजणं, तिचं झुरणं
हृदयाला जे  सुखवतय..
तिचं नसणं, मुके रडणं
एकेक ठोका चुकवतय

----- आदित्य देवधर 

Wednesday, June 23, 2010

तिजोरी

यशाची तिजोरी रिकामीच सारी
कुणीही म्हणावे अम्हाला भिकारी

करा साजरे सोहळे प्राक्तनाचे
दिवे लावतो घेउनी मी उधारी

तशी मोजकी आसवे 'एकटया' ची
उशाशी सकाळी मुकी वाटणारी

ज़रा चाखली वर्तमानात आशा
कळे ना कधी भूत झाले विषारी

अजूनी दिवा लावतो सांजवेळी
अजूनी उभा वाट पाहीत दारी 

तुझे नाव गेले झिजूनी अताशा
स्मृतीही तुझ्या आज झाल्या फरारी

------आदित्य देवधर

Wednesday, June 16, 2010

आवाज आसवांचा

हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

दुष्काळ दाटलेला आनंद आटवोनी
डोळ्यांस पूर आला का आज आसवांचा?

डोळ्यात कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

----आदित्य देवधर 

Thursday, June 3, 2010

कोडे

आयुष्याचे कोडे कधीच सुटले नाही
उत्तर या प्रश्नाचे कधीच सुचले नाही

झाले ऐश्वर्याचे जुने सोहळे आता
स्वप्नांमधले घोडे कधीच उठले नाही

कागद कागद ओला करतच गेली शाई 
अर्थालाही कसले कारण उरले नाही

कोणी आले नाही निरोप देण्या मजला 
मी गेल्यावर मागे कुणीच झुरले नाही

कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे
आभाळाचे  पाणी  कुठेच  मुरले  नाही

वाटेवरती माझ्या तुझी नजर उलगडली
(ओठावरती गाणे उगीच फुटले नाही!!)

-------आदित्य देवधर

Wednesday, June 2, 2010

ललकारी

घेऊन आन विसरून भान म-हाट शान दे झणी आज ललकारी
घुसळून रान बेधुंद जान उन्मत्त खान, कापुदे मर्द तरवारी
दे झणी आज ललकारी

पाषाण अंग म-हाट ढंग वादळी संग घेऊन निघाली छाती
तेजाळ रंग बांधून चंग आतंक भंग होउदे मुक्त ही माती
ओकून आग मिटवून डाग कामास लाग झाडून सोड लाचारी
दे झणी आज ललकारी

रक्ताळ वाट रान घनदाट स्वातंत्र्य घाट बांधून आज येथे 
सरदार थाट इथे सम्राट माय मरहाट नांदून आज येथे
येउदे पूर पालटे नूर गर्जुदे सूर जयघोष हाच दरबारी
दे झणी आज ललकारी

-------आदित्य देवधर 

Wednesday, May 26, 2010

भावना

           भावनांना भाषेच्या, रंगाच्या मर्यादा नसतात. ते तर केवळ एक माध्यम आहे. पण मनातलं सांगायला काही canvas  नको का? कोणाचा चेहरा तर कोणाची शाई, कोणाचे रंग तर कोणाचे सूर.. असे या भावनांना अडकू देत नाहीत. त्या किना-यावर येउन उसळतातच. त्यांचे तुषार मग अशी काही गुंफण करतात की त्यांचा शिडकावा रखरखीत दगडांवर  ओलावा आणि मार्दव निर्माण करतो. इतका की कधीकधी हे कठीण कण स्वत:चे अस्तित्व विसरून या सागरात मिसळून जातात. या भावसागरात. ते आता स्वत: भावनांच्या हिंदोळ्यावर झुलून मुक्त आनंद घेत जातात. असाच एक कण, भारलेला पुन्हा परत येतो. त्याला आता त्याचा canvas  मिळाला असतो. किनारी अंकुरणारी हर एक पालवी, हर एक आकृती त्याला प्रेरणा देते. कोण अडवणार त्याला..!!!
            ही भावनांची लाट  झिंग आणणारी आहे. या लाटेवर थोडं खेळायला हवं. स्वत: ला विसरायला हवं. शब्द ,सूर आपोआप सुचत जातील. रंग आपोआप आकार घेतील. एका तरी भावनेला canvas मिळेल!!


-------आदित्य देवधर 

जगायचे..मरायचे

जगायचे आहे तरी रोज थोड़े मरायचे
मरायचे आहे तरी आज थोड़े जगायचे

कुणीच कोणाच्या व्यथेला उराशी न लावते 
स्वत:च ही आभूषणे लेउनी मिरवायचे

शहारलेल्या नील धारा किनारी खुणावती
दुरून ओंजळीतुनी मृगजळी बुडायचे

अजून आभाळातली चांदणी दूर भासते
अजून काळोखातुनी अंतरंगी जळायाचे

चितेत ओली लाकडे देह जाळीत शेवटी 
मरायचे एकाक्षणी मातीतुनी उरायचे

-------  आदित्य देवधर

तेरे नज़ारे की

हमें उम्मीद न थी तेरे नज़ारे की
क़यामत दीवानी थी तेरे नज़ारे की

गुजरा करे गलीसे तेरी ए हुस्न वाले
बुझा दो प्यास हमारी तेरे नज़ारे की

बेताब दिल की जुबाँ कैसे बयाँ करू मैं
एक झलक तो पिला दो तेरे नज़ारे की

एक बार मुस्कुराके देखो ज़रा इधर भी 
गीली हसीं बरसा दो  तेरे नज़ारे की

लो चले हम उठकर दुनियासे तुम्हारी
तमन्ना बंद आँखों में तेरे नज़ारे की

पाँव मेरे लडखडाये कभी राह चलते
यादे मिली पुरानी तेरे नज़ारे की

------आदित्य

सावलीचे सोहळे

मेघ काळे लाघवी प्रिये दाटले केसात तुझ्या
हे कुणाचे दूत बावरे धावले केसात तुझ्या

संधिकाळी साठतो नभी रोज चाफ्याचा चुरा
फूल होते पीतवर्णी माळले केसात तुझ्या

दाट आभाळातुनी असे होतसे थेंबास कधी
वाहुनी एकदा जसे नांदले केसात तुझ्या
 
शुद्ध ना गे राहते मला पांघरोनी केस तुझे
रेशमाचे स्पर्श कोवळे लाभले केसात तुझ्या

दाटता अंधार हा कधी दूर ना व्हावा मुळी 
या तमाच्या सावलीचे सोहळे केसात तुझ्या

------आदित्य देवधर

Monday, May 24, 2010

चंद्र झालो

मी वाट चांदण्याची शोधीत चंद्र झालो
माझ्या कलाकलांना सजवीत चंद्र झालो

कल्याण आळवीती ओल्या मधाळ राती
गंधार भाववेडा ऐकीत चंद्र झालो

खाणाखुणा तमाच्या शोधून सांगताना 
शुक्रास मी ललाटी भाळीत चंद्र झालो

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या 
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र झालो

होता सभोवताली बेधुंद रोषणाई 
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र झालो 

रातीस पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत चंद्र झालो

-------आदित्य देवधर

Friday, May 21, 2010

वाट पाहे दारावरी

गोठुनी व्यापे निराशेची हवा दारावरी  
वाट पाहे सांजवेळी पारवा दारावरी

सैल होता आठवांची गुंफलेली मालती 
गीत गाता थांबतो गे मारवा दारावरी 

हीच का ती वाट होती हीच का माझी कथा 
हीच का ती सांडणारी चांदवा दारावरी 

पेटला वैशाख येथे पेटवोनी प्राक्तना
कोठुनी आणू सुखाचा गारवा दारावरी

तेज ओले होत जाता निर्बली झाली धुनी
प्राण ताजे फुंकणारा बोलवा दारावरी

वाट पाहे जीव माझा कैक वर्षांपासुनी
येउनी गेला कुणाचा कारवा दारावरी?

------आदित्य देवधर

Wednesday, March 31, 2010

आई

मायेचा परमेश्वर तू, वात्सल्याचा वसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

दैवी अमृताचा तू पान्हा मजला दिला
संस्कारगंध माझ्या श्वासात आरोहिला
परतोनी माय देऊ गंधास आता कसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

हाक कानी पहिली तुझीच ऐकू आली
दृष्टीस माझ्या, आई, तुझीच मूर्ती आली
शब्दास लाभला तुझिया, गंधर्वाचा ठसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

अंगणात अडखळताना आधार तुझा होता
भूक लागता मजला पहिला घास तुझा होता
डोळ्यात आनंदाचा गंगौघ दाटला जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

पिलास चिमण्या देशी तू ढगाएवढी माया
पंखाखाली घेशी माझी इवली इवली काया
थोपटताना पाठीवरला  हात राहुदे असा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

आशीर्वाद पाठी मजला तुझा सर्वदा मिळे 
पूत अंजनीचा जावोनी मग सूर्यालाही गिळे
तुझ्याच चरणी अर्पण माझ्या कर्तृत्वाचा पसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

तुझी घडावी सेवा आई भाग्य लाभुदे मला
कोटि कोटि उपकार तुझे, वंदन माते  तुला
निरपेक्ष तू, निस्वार्थ तू, कर्मयोगी जसा
आई, या जन्माचा मी उतराई होऊ कसा?

-------- आदित्य देवधर

Friday, March 26, 2010

गाणे

मज ठाऊक आहे तुझ्या मनीचे ओले भिजलेले गाणे
रुसवे फुगवे लाख लाख परी मृदुल तराणे गाणे
हृदयामधुनी ओठांवरती अलगद अल्लड गाणे
नाजुक तारा शोधुनी परी छेड़े लोभस  गाणे
शब्द शोधती क्षितिजाच्याही पलीकडले मधु गाणे
गाता गाता मंजुळ सुस्वर गाती तुझेच गाणे

अंगावरती फुललेल्या मोरपिसाचे गाणे
चंद्रावरती भुललेल्या नक्षत्राचे गाणे
कमलावरती थिजलेल्या थेंबाचेही गाणे
फूल चुम्बुनी भ्रमराच्या प्रेमाचेही गाणे
मेघ बरसुनी धरतीवरती वर्षाकाळी गाणे
ताल धरुनी पानांवरती ओघळणारे गाणे
जीव भरुनी दगडांमधुनी पाझरणारे गाणे
निळ्या जांभळ्या प्रतलावरती हिरवळणारे गाणे

हे गाणे तू गाऊन जा, स्वर हृदयी बरसून जा

-------आदित्य देवधर 

पाहते

पाहते तुज पाहते लाजते मी लाजते
भावगंधित होउनी भाळते मी भाळते

मोहरून शहारती अंगअंगीची पिसे
काननी मयुरासवे नाचते मी नाचते

फूलही उमलून देई मनाला पावती
पाखरू चुचकारते, हासते मी हासते

चंद्रकोर उजाडुनी रात ना जावो कधी
कोवळ्या किरणांतुनी भारते मी भारते

बासरी कुठुनी बरे सूर छेडी लाघवी
कुंद धुंद सुरावरी डोलते हिंडोलते

सागरावर लाट येता मनासी वाटते
अर्पुनी अवघे स्वत: वाहते मी वाहते

सांजवेळ किनारली, कृष्णवेडी सावली
दीप मी चरणी तुझ्या लावते, ओवाळते

अंतरी नयनातुनी पाहिले रे मी तुला
राजसा तव मीलना, धावते मी धावते

-------- आदित्य देवधर

Tuesday, March 23, 2010

ताटातूट

बोलावयास माझ्यापाशी कुणीच नाही
मी हाक मारलेली, आले कुणीच नाही 

गाण्यात भावनांची दाटी तुडुम्ब झाली
बाजार संगिताचा येथे उगीच नाही

कुंथून गावयाच्या झाल्या फुशारक्याही
अर्थास दाद देण्या दर्दी कुणीच नाही

झाकून पाहिले मी, हासून पाहिले मी
डोळ्यांस आसवांची ताटातुटीच नाही

देवास वाटलेले थोड़े समोर यावे
भक्तात दर्शनाची दृष्टी मुळीच नाही

------- आदित्य देवधर

जाऊ नको

विझवून रात माझी, तू आज जाऊ नको
भरतीस लाट येता , आटून जाऊ नको

नुकतेच चंदनाने मी आज गंधाळले
नुसताच एकट्याने चंद्रात न्हाऊ नको

कसली शराब मजला, डोळ्यातुनी मिळाली
असल्या नशेत धुंदी होण्या सराऊ नको

अजुनी न वेळ गेली, रातीस चाखण्याची
अंधार जागवूनी  तू दूर राहू नको

असले कसे तुझे रे प्रेमास लाजावणे
निरपेक्ष जोगियाच्या गीतास गाऊ नको

तुजला कळे न माझे होणे परीसापरी
मधुस्पर्श मीलनाचा सोडून जाऊ नको

--------- आदित्य देवधर

Monday, March 22, 2010

गर्दी

प्रेमात भावनांची गर्दी उगीच झाली
नशिबातली कहाणी आता खरीच झाली

बागेतली गुलाबी झाडे मलूल झाली
मीही तसाच झालो, तीही तशीच झाली

आव्हान देत होतो दररोज वेदनांना
जखमा उगाळण्याची चर्चा बरीच झाली

स्वप्नांत जाळण्याला दिधल्या कितीक राती
झोपेत जागण्याची बुद्धी उगीच झाली

काळोख वासनांचा भारी मुजोर होता
बेधुंद लांडग्यांची नुस्ती सुगीच झाली

केल्या कितीतरी मी पायी बळेच यात्रा
कोटी उपासनांची भक्ती फुकीच झाली

मी पाहिला दिखावा खोटाच भोवताली
अंगात लक्तरांची मारे जरीच झाली!

---------- आदित्य देवधर

Friday, March 19, 2010

साक्ष

गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

हात हाती घेतलेला
मी असा घामेजलेला
तू करारी  पाहुनी मी
धीर मोठा वेचलेला
तू दिलासाही दिलेला
श्वासही धीरावलेला
हे निघालो दोन प्रेमी
सोडुनी नाती निकामी
साथिला होताच सारा
भोवताली धावणारा
.......गार वारा बोचणारा

वेग होता या मनाचा
चांदण्याला गाठण्याचा
सावल्यांची खूण होती
वेळ ही नव्हता क्षणाचा
मी निघालो वायुवेगे
भारलेली प्रीत रंगे
धूळकाटया सोबतीला
रातिचा काळोख संगे
बेत होते कोण जाणे
ठार वेडे की शहाणे
साक्ष देई दूर तारा
चांदण्याचा ही इशारा
.......गार वारा बोचणारा

हाय जेव्हा झोक गेला
काळ सामोरीच आला
मी मनाशी ठाम होतो
एकट्याने वार केला
देवही खोटे निघाले
दैत्य सारे एक झाले
घेउनी गेले तिला ते
रक्त माझे क्षुब्ध  झाले
पाठलागी लागलो मी
धावलो मागे तया मी
घेउनी तिजला निघालो
आड़ वाटा शोधुनी मी
संकटांची फौज मागे
धावताना ठेच लागे
तेथ होता मार्ग एकच
घेतल्या शपथांस  जागे
दोन प्रेमी पाखरे ती
धावुनी टोकास जाती
देउनी आलिंगना ते
सोडुनी देहास देती
शेवटी एकत्र आले
प्राण-देही एक झाले
मिसळले मातीतुने ते
श्वासही तेथे निमाले

घोर तेथे लावणारा
साक्ष सारी वेचणारा
दोन थेंबे सांडताना
गार वारा बोचणारा
साथ देती चांद तारा
वेळ होती भारलेली
रात्र होती धुंदलेली
सागराचाही किनारा
हेच होता सांगणारा
.......गार वारा बोचणारा

-------------- आदित्य देवधर

Thursday, March 18, 2010

एवढेचि मागणे

दे अम्हाला दान देवा एवढेचि सांगणे
ज्ञान शक्ती दे विवेकी, एवढेचि मागणे

काळ रात्री पाचवीला आमुच्याचि पूजिल्या
सूर्य येथे मज दिसावा एवढेचि मागणे

पोट झाले पापभीरू, सांगतात आतडी
जेवण्यासी घास द्यावा एवढेचि मागणे

माजले आहेत येथे मंदिरात भामटे  
बाहु माझे सळसळूदे एवढेचि मागणे

सूर आले माझिया दारी कसे नभातले
ते गळी राहो भरोनी एवढेचि मागणे

माझिया देहास लाभो भाग्य दीपकापरी
प्राण राहो वा न राहो एवढेचि मागणे

------- आदित्य देवधर 

करणार आहे

आज श्वास मी मोकळा भरणार आहे    
मुक्त वाट डोळ्यांतुनी करणार आहे

मागची  लढाई जरी बिनधास्त होती
आज मी  युद्धाचा बळी ठरणार आहे

आसवांतुनी लाभले मज थेंब काही
का दुष्काळ याने तरी सरणार आहे ?

तांबड़े  रक्त वाहिले धरित्रीस मागे
रंग तोच  मातीतुनी उरणार आहे

काळ होत मी बांधुनी कफनी ललाटी
आग ओकुनी  वादळी  उठणार आहे

कायदा जरी बाटला  मगरूर हाती,
न्याय तोच जो मी दिला असणार आहे

एवढ्यात का हो तुम्ही केली चढ़ाई?
एकटाच भारी रणी ठरणार आहे

------- आदित्य देवधर

Friday, March 12, 2010

खादाड पंगत

खाउनिया गोड | साखरेची जोड |
चरण्याची खोड | लागलेली  ||

पंगतीचे पान | भरोनिया छान |
विसरून भान | खाऊ लागे ||

पानाचिये पुढे  | तुटोनिया पड़े  |
वाढप्यांची उड़े | तारांबळ ||

जेवताना श्लोक | म्हणण्याचा षोक |
पुण्यवंत लोक  | राखतात ||

आग्रहाचा घास | भरवाया ख़ास |
बायकोचे पास | जाऊ लागी ||

बायकोने घ्यावं | नव-याचे नाव  |
लाजण्याचा आव | आणोनिया ||

पैजेचाही खेळ | कितीतरी वेळ |
हिशेबाचा मेळ | घालितासे ||

संपता पंगत | तोंड ही रंगत |
खादाड संगत | आजूबाजू ||

पडावे निवांत | दुपारी एकांत |
घोरोनिया प्रांत | हादरावा ||

पुढच्या सणात | कोंणाच्या कशात |
चर्चा ही घरात | चालू राही ||

भूक भागावी | इतकेचि खावे |
म्हणतात सारे | संतजन ||

म्हणोनि  अभंग |  भरोनिया रंग |
खादाडांसी दंग | चला करू ||

------- आदित्य देवधर

व्हायचे ते

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?

आज आले जरी अवसान हाती
पार नेण्या तुला पुरले कधी का? 

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?

धूमकेतू झणी स्फुरता ,  करंटे
आडवाया तया धजले कधी का

हस्तरेषा ख-या पुसल्या कुणीही
व्हायचे ते जगी चुकते कधी का?

 ---------- आदित्य देवधर

Sunday, March 7, 2010

कधीच ... नाही !!

देवाच्याही मदतीला कधीच गेलो नाही
जळलोही पण पुरता कधीच मेलो नाही

मज होते फुटलेले पंख नवे, उडण्याचे
परवाने मिळवाया कधीच गेलो नाही

प्रेमाचा अश्रू ओला डबडबलेला हाती
मिटून घेण्यासाठी कधीच गेलो नाही

गरजांना उघडे माझे दार तिजोरीचे
गरजूंचा हिशोब करण्या कधीच गेलो नाही

अभिमन्यूसम मी निधडा पडलो धारातीर्थी
भीक मागण्या पायी कधीच झुकलो नाही

अंगावरच्या ताज्या युद्धाच्या जखमा माझ्या
मिरवून विकण्यासाठी कधीच गेलो नाही

-------- आदित्य देवधर

उष्टे

महालातुनी भोगलेले
सूर उष्टे झोंबले
मुक्यानेच देती शिव्या
दरिद्री खुराडयातले

फितूरी अशी का जाहली
माझ्याच आसवांची
विझविती चितेस अश्रू
माझ्याच डोळ्यातले  

करायास चैनी लांडगे
मोकाट भोवताली
मला टाकती उष्टे, शिळे
यांच्याच ताटातले  

कधी लाभला पूर
मनसोक्त भोगावया
कधी मजवरी थुंकले
पंडिती थाटातले

यांचाच रंग येतो
देवा तुझ्या राऊळी
जरी गाळले येथे
मी तांबडे रक्तातले

----- आदित्य देवधर

सांग तुला मी काय म्हणू

म्हणेल कोंणी तुला अप्सरा
गगनाची तारका जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू

लाल चुटुकसे ओठ तुझे
गुलाबास लाजवील असे
दोन पाकळ्या भिजलेल्या
तीवर नाजुक थेंब दिसे
दाखवुनी वाकुल्या मला
ओठांना लागले म्हणू
"रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू "

न्हाउनी उजेडात कुंतल
सोनेरी निर्झरी दिसे
लबाड वारा संधीसाधू
उधळे स्पर्शभरित पिसे
कानामधला झुमकाही मग
वाजू लागे रुणूझुणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


हास्य तुझे मोहक लोभस
भान हरपुनी न्हात बुडावे
नजरेमधुनी खट्याळ खोडी
करताना तू मनी वसावे
तुझ्या अनोख्या अंदाजाने
शहारले मम अणू अणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


नक्षत्रांची सखी म्हणू की
खळखळणारी नदी म्हणू
लसलसणारी कळी  कोवळी
की पुनवेची परी म्हणू
नभी साजिरा चमचमणारा
शुक्र लाजला तुला जणू
रूप मनोहर तुझे साजणे
सांग तुला मी काय म्हणू


--------आदित्य देवधर

Wednesday, March 3, 2010

मिटोनिया पापण्या

दुपारची शांतता काय सांगते बरे
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

रुसेल का पाहुनी टीम लीड चावरा
बगांस मी झेलुनी रोज काम आवरे 

समोरचा लैपटॉप नको आज वाटतो
फितूर या पापण्या आज काम फार रे

कसाबसा संपला कोड रिव्ह्यू आजचा 
उठोनिया पेंगुनी मी मलाच सावरे

लगाम मी घातला घोरण्यास चोरटा
नको नको सांगती श्वास होत घाबरे  

कधीतरी येत जाग डोकवून आतुनी
इथेतिथे पाहती लपून नयन  बावरे

भिऊ नको तू उगा कोण काय बोलती
जळोनिया आतुनी हे तुझे कलीग रे

करोनिया बाजुला डॉक्यूमेंट फालतू
मिटोनिया पापण्या शांत झोप तू बरे

जमावया लागता  झोप डोळीयांवरी
झुकोनिया डेस्कवरी  मस्त झोपतो बरे  

 -------- आदित्य देवधर

Tuesday, February 23, 2010

स्वामीसाधन

        एका कॉलेजातून एक कोर्स चालवला जातो. शिस्तीत डिग्री मिळते. 'बी. ए. इन स्वामीसाधन' अशा नावाची.गेल्या तीन वर्षां पासून इथे मुलींसाठी देखील कोर्स सुरु केलाय. त्यानांही हल्ली फार डिमांड आहे. इथे प्रत्येक जण स्वत:ला हवी ती पदवी घेऊ शकतो. सांगायचंच   झालं तर बाबा, बुवा, बापू, बाई, आई, ताई यांपैकी काहीही. दरवर्षी एखाद्या क्रिएटिव्ह पदवीला बक्षीसही मिळतं. याची पात्रता म्हणाल तर मात्र  फार अवघड आहे. सायन्स, मानस शास्त्र यांची माहिती पाहिजे. शिकलेलं असायची गरज नाही. फाटके कपडे घालायची सवय, दाढी वाढवणे, रात्री भटकणे, पत्ते, चरस, गांजा, बाटली यांची ओढ़ असल्यास फायदेशीर आहे. Admission सोपी होते हो..!!
        पहिल्या वर्षापासून यांचं Proffessional Training सुरु होतं. गणवेश मिळतो. यात पण choice आहे बरं का ! कोणी पांढरा डगला, तर कोणी काळा, कोणी भगवा सदरा तर कोणी पिवळा कुर्ता. तसंच साड्यांचं. हे रंग 'Major' प्रमाणे ठरतात. इथे दोन शाखा आहेत. एक 'अघोरी' तर एक 'अध्यात्मिक'. तुम्हाला पहिल्या वर्षापासुनच निवडावी लागते. दोन्ही शाखांना सामान स्कोप आहे. अघोरी शाखेला 'लिंबू विज्ञान' शिकवलं जातं तर अध्यात्मिक ला 'गूढ़ शास्त्र' असतं. एका अध्यात्मिक पास आउट चा मी Interview पहायला मिळाला. पहायला म्हणजे काय.. योगायोगानेच! एक भक्त त्याला प्रश्न विचारत होता. ( भक्त आणि तमाम शिष्य गण यांचे मुख्य मार्केट आहे.)
(स्वामी भगवा डगला घालून एका खोलीत गुबगुबीत गादीवर बसले होते. कपाळावर टिकली एवढ कुंकू. गळ्यात उपरणं. उदबत्ती आणि धुपाचा सुळसुळाट..स्पष्ट दिसू नये इतपत. 'ॐ' वाजणारी टेप. खोलीबाहेर गर्दीचा आव. )
भक्त : स्वामी ,  अर्घेश्वराय नम: !!! ( हे या पंथातलं 'Hello' किंवा नमस्कार शी समानार्थी ब्रीद. आणि अर्घेश्वर स्वामी हे यांचे   नामकमल! हा भक्त इतर आणि स्वामी यांना जोड़णारा दुवा आहे. मधली खाबुगिरी आणि लोचटगिरी चांगली जमते यांना )
स्वामी : कल्या SSSSSSSS ण !!!! (आणि मागे घंटेचा आवाज --- back ground music हो ....!!!!)
भक्त :  प्रातर्विधीत काही बाधा तर नाही ना ..!! ( भलते अर्थ काढू नका .... संध्या, पूजा, ध्यान वगैरे म्हणायाचं  आहे !!)
स्वामी : क्षेम आहे (उपकाराचे  भाव . नाहीतर  भाव कसा मिळेल?? )
भक्त : (छताकडे बघून आणि हात उगीच वर नेऊन) अनंत उपकार आहेत !!! (समोर साक्षात् दत्त बसल्याचा भाव.आणि यांच्या प्रातर्विधी मुळे उपकार कसे झाले  कोणास ठाऊक! ) काही गण आले आहेत ( जण च्या ऐवजी चुकून गण आलं बहुतेक तोंडात)
(काहीही न बोलता स्वामी मान डोलावतात. भक्त मागे वळून खेकसतो )
भक्त : दोघांना पाठव रे !!!! ( आत पाठवणारा गुपचुप दोघांना आत पाठवतो. याचा खिसा ही 'गळकी' दक्षिणा पेटी आहे हे लक्षात येतं.)
(दोन जण आत येतात. शिकविल्याप्रमाणे नमो नम: करतात आणि अपराध्यासारखे मान खाली घालून उभे राहतात.)
भक्त :स्वामी गांजले आहेत हे. काही प्रश्न घेउन आले आहेत.
( त्याला 'गंजले' म्हणायाचं असेल . सारखा चुकतोय हा दुवा. ते  दोघं गांजलेले  नक्कीच वाटत नव्हते . सुटलेलं पोट आणि फवारलेले कपडे घालून गांजलेले कमी पण माजलेले जास्त वाटत होते. एकमेकाना ओळख़त नसावेत. स्वामी काहीही न बोलता तोबरा प्राशन करून असतात. मंद स्मित करून मान डोलावतात. भक्त पात्र पुढे करतो. स्वामी त्यात पेंटिंग सुरु करतात.)
प्रश्नार्थी १: बिझनेसमन आहे. पैसा खुप आहे. पण झोप शांत नाही.
स्वामी: (स्मित चालूच आहे) या उपभोगाच्या मायाजालातून  कोण सुटले आहे? मोक्षाचा मार्ग खडतर आहे.
प्रश्नार्थी ला काहीही कळत नाही. तो पुन्हा तोच वाक्य उच्चारतो ' पण झोप येत नाही.'
(डॉक्टर कड़े जायचं सोडून इथे का आलाय हा ......??)
स्वामी: ( पेंटिंग करत ) ध्यान धारणा करा. प्रभूच तुम्हाला मार्ग दाखवेल.
(भक्त तर आडवा पडण्याच्या बेतात आलाय. वाकून वाकून..
( प्रश्नार्थी बहुतेक झोप विकत घ्यायच्या उद्देशाने आला होता. त्याला असलं काहीतरी म्हणजे चेष्टाच वाटली. त्याने परत एक प्रयत्न करून बघितला)
प्रश्नार्थी 1 : जमवलेला पैसा निघून  तर जाणार नाही याची सतत चिंता वाटते. लक्ष्मीचा लहरीपणा तुम्हाला माहितच आहे.
(या वाक्याने स्वामी जरा चपापतात. याला कसं माहीत अस एक प्रश्न चाटून जातो. पुन्हा भानावर येउन स्मित क्रमश: चालू...)
स्वामी: दान करा(मला दया) गरजूंना मदत करा. आश्रमासाठी खर्च करा. कल्याण होइल. चिंता मुक्त होशील. ..!!!
(प्रश्नार्थी भारावून जातो. नमस्कार वगैरे करून पाठ न दाखवता मान वाकवून उलटा चालत जातो . भक्त बाहेर खूण  करून योग्य तो निरोप पोचवतो
आता पाळी दुसरयाची)
प्रश्नार्थी २: स्वामी तुम्ही वेद आणि गीता  वाचलेत का ? मला काही प्रश्न आहेत. तुमचा सल्ला घ्यायला आलोय.
(पहिलाच बॉल बाउंसर. दोन क्षण स्वामी आणि भक्त त्याकडे पहातच बसतात. हा अता याची विकेट  घेणार असं वाटून मीही खुष होतो.)
स्वामी: बोल वत्सा..(नाही म्हणून कुठे जाणार ....)
प्रश्नार्थी २: माणूस मेल्यावर त्याच्यासाठी उदक का सोडतात ?
(यॉर्कर... डायरेक्ट बुंध्यात !)
स्वामी: आत्म्याला शांती मिळावी म्हणून वत्सा...!(अत्तापुरती वाचवली विकेट)
प्रश्नार्थी २: एखाद्या संगमावर पाणी सोडून मेलेल्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? आणि एवढीच इच्छा असेल तर तो जिवंत असताना असं का करत नाहीत?
(स्वामींना घाम फुटतोय. भक्त प्रश्नार्थी कड़े रागाने अणि स्वामींकडे आशेने बघतोय.)
(अर्धा मिनिट कोणीच काही बोलत नाही. स्वामी पाणी मागवतात. पण पीतच  नाहीत. वेळकाढूपणा... दुसरं काय ..?)
प्रश्नार्थी २: गीतेत म्हटल्याप्रमाणे माणूस आपले कर्म करत असतो. ते त्याने केलेच पाहिजे. चालू असलेला जन्म त्याच्या पाप पुण्याचा हिशोब आहे. मग अतिरेकी जे करतायत त्याला काय म्हणायाचं?
(आता भक्तही बेशुद्ध व्हायच्या मार्गावर  आहे. स्वामींचा बहुतेक हा विषय राहिला असावा दोन चारदा. स्वामी विश्रांतीची वेळ झाली म्हणून उठतात आणि पुढची Appointment देतात.)

श्रद्धेचा बाजार झालाय सध्या. आणि या सारख्या स्वामींमुळे खरया साधक लोकांची सुद्धा चेष्टा होतीए. लोकांनी ठरवायाला हवे. अशा तोतया लोकांना किती थारा द्यायचाते.
मी त्या प्रश्नार्थी ला जाऊन भेटलो. तो एक पत्रकार होता. संस्कृत  मधून डिग्री घेतली होती.  आणि आशा बाबा लोकांचे बिंग फोड़ण्याचे एका संस्थेचे काम करत होता. कौतुक वाटले. तोही उत्साहात होता आणि पुढच्या appointment ची नोंद करून निघून गेला. अजुन एका स्वामींकडे!!!