Pages

Tuesday, June 20, 2017

धुंद वाटा

धुंद हरवल्या वाटांमध्ये
सापडलो मी आज मला
स्वप्नांमधुनी तरंगताना
बहर प्रेमाचा फुलला

भारून सारा आसमंत
वर्षावातून अनुरागाच्या
अल्लड अवखळ मेघ नव्याने
इंद्रधनू वरती झुलला

ओल्या हिरव्या रंगांमध्ये
न्हाऊन उडता दोन पाखरे
तुषार अवघ्या नभी उधळूनी
चिंब पिसारा अवतरला

गूज सांगते लाडिक बिलगून
धुके कुंद घनदाट असे
की वाटावे मिठीत येऊन
पाऊस गाणे गुणगुणला

भाव भावना मनी उमलता,
स्पर्श शहा-यातुनी वाहता
गंध मनीचा मिसळून
मातीसंगे भवती दरवळला

गोल टपोरे मोती बरसून
सजवे पाऊस रूप तुझे अन
स्मृतींत अलगद चिरतन क्षण हा
ओठांनी हलके टिपला

नितांत निर्जन रानामध्ये
हात घेऊनि हाती ऐसे
श्वासांमधले अंतर संपून
काळ मिठी मधुनी थिजला

----आदित्य

Friday, February 3, 2017

गणगोत

एक एक पारंबी होऊन वाढत आहे
वृक्ष निरंतर रेशीम गाठी जोडत आहे

ऊन असो वा पाऊस आणिक वादळ वारे
फुला फुला ला कुशीत घेऊन बहरत आहे

नाजुक पानांवेली मध्ये पुन्हा नव्याने
जीव स्नेह अनुबंध जोडण्या ओतत आहे

जिव्हाळ्याच्या, वात्सल्याच्या पायावरती
आनंदी गणगोत सोयरा नांदत आहे

--- आदित्य

बोलताना नेमके सांगायचे सुचलेच नाही

बोलताना नेमके सांगायचे सुचलेच नाही
'सांग' म्हणणारे तसे डोळे पुन्हा भिडलेच नाही.

श्वास होते गुंफलेले लाघवी गजऱ्याप्रमाणे
फूल कैसे कोणते गळले कधी कळलेच नाही

सांडले स्वप्नांतुनी मोती स्मृतींच्या आसवांचें
आठवांनी एरवी डोळे कधी भिजलेच नाही

सांगता होताच पडदा ओढला डोळ्यांपुढे की
सावली वा भास प्रेमाचे मुळी झालेच नाही

-----    आदित्य

Wednesday, August 10, 2016

पावसापरी बरसून जा तू

पावसापरी बरसून जा तू
आलिंगन मज देऊन  जा तू
स्पर्श राहूदे इथेच ऐसे
शहा-यांतूनी उरून जा तू

गंधित ओले श्वास उष्णसे
हृदयामध्ये ओतून जा तू
आठवणीं चे नाजुक मोती
स्वप्नांमधुनी गुंफून जा तू

ओल्या ओल्या मिठीत माझ्या
हळुवार विरघळून जा तू
गात्रांना चेतवून साऱ्या
माझ्यामध्ये मिसळून जा तू

--आदित्य

Monday, May 30, 2016

बोचरी स्वप्ने सुखांची

बोचरी स्वप्ने सुखांची उसवुनी निद्रेस जाती 
बंद डोळ्यांनी अताशा जागतो कित्येक राती

कोरड्याने मेघ येती, हुंदक्यांना साथ देती
मात्र डोळे ओलित्याने वेदना-मल्हार गाती

घेऊनी आलो किती पत्रे तुझ्या अंगणात माझी
हाय धोका जाहला शिशिरात गळली सर्व पाती

या जगाचा मी कधी नव्हतो, कधी होणार नाही
सोडुनी मी नेहमी जातो सृजन-वेल्हाळ माती

तेल होते संपलेले जाळुनी स्वप्ने दिव्याची
उजळली आशा नव्याने भिजवुनी घामात वाती

---आदित्य

Thursday, May 19, 2016

अश्रूंचे अवकाळी तांडव

अश्रूंचे अवकाळी तांडव काळाच्या पटलावर घडले
आभाळाचे पाणी आभाळाच्या डोळ्यांमधेच थिजले
 
ऐन मैफिलीमधे समेवर मोजुन मापुन येता येता
हृदयाशी अवखळणारे ते सूर अचानक हवेत विरले

निरोप आला होता ज्याचा त्याला प्राक्तन घेऊन गेले
पाठीमागे आठवणींचे भूत नाचण्यापुरते उरले

श्वास रोजचे, भास रोजचे, घेऊन पुढचा दिवस निघाला
रोजरोजचे सूर्यबिंबही पूर्व क्षितीजावरी उगवले

--- आदित्य 

Monday, August 17, 2015

अंदाज

मी स्वतःशी बोलताना सागराचा भास झाला
लाट आली एक अन माझा मला अंदाज आला

स्वप्न होते की कुणाचे मिथ्य होते वास्तवाचे
जन्म घेण्याचा पुरावा सत्य पाझरता मिळाला

पेलतो डोळ्यात ताकद हिकमती माझ्या ऋतूंची
सांगतो सूर्यास देखिल रोख तू करड्या उन्हाला

सोडुनी गेले पुजारी, भक्त सारे अन भिकारी,
राहतो कंटाळलेला देवही तेथे कशाला ?

वाहुनी नेले किनारे , धार ती कोठून आली
पाट म्हटलो मी जया तो पूर अश्रूंचा निघाला
 

गाज ऐकुन एकदा , म्हटले पहावे कोण आले
सावली माझीच अन आवाजही माझाच आला


--आदित्य 



Thursday, August 13, 2015

क्षितिजाच्या पलीकडे

मला क्षितिजाची  सीमा नव्हतीच कधी. मी त्याच्या पलीकडला आहे. आणि तिथेच जाणार अहे. एवढी छोटी बंधनं मला अडकवू नाहे शकत.  इथे जेव्हा आलो तेव्हा क्षितिजाची पायरी ओलांडून स्वैर धावलोय, खिदळलोय. माझ्या सावलीशी खेळलोय. मला इथे सावली मिळते. माझ्या बाह्यजगात सावली नाही. मीच माझा प्रतिनिधी. इथे वावरताना इथल्या मायेमध्ये कसा अडकलो तेच कळल नाही. पण आता मला बाहेर जायचय . क्षितिजाच्या पलीकडे!

---आदित्य

कर्तृत्वाचा कोण दिखावा!

कर्तृत्वाचा कोण दिखावा करता येतो!
जन्मही आता ठरवुन आम्हा घेता येतो

दु:ख मुळी तू करू नको कोणी मेल्याचे
प्रेतामध्ये जीवही अता भरता येतो

भाव लागतो सध्या भगवंताचा देखिल
खिसा तयाचा अभिषेकाने जिंकता येतो

रक्ताच्या नात्यात असूदे वा मैत्रीच्या
कोणाचा विश्वास कसाही विकता येतो

बेशरमीचा घेत कुंचला उजळपणाने
राजरोस झेंड्याचा रंग बदलता येतो

घरे बदलुनी कुंडलीतल्या दुष्ट ग्रहांची
नियतीचाही डाव पुरा उलटवता येतो

---आदित्य 

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही
अश्या  तुझ्या दानाचा काहीच उपभोग नाही
रिकामा आलास तू आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून

कुठे जाउन आलास की नव्हतच काही द्यायला?
वेळ झाली म्हणून आलास अणि चाललास पुन्हा पोट भरायला
तुझी जमीन तुझी वाट पाहते आहे
कधीतरी येशील अणि मन मोकळ करशील याची
भरभरून येशील आणि चिंब भिजवशील याची

पण तू तर रिकामा आलायस आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून…….
अश्या तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही!

 ---आदित्य 

एक मुसाफिर

एक मुसाफिर वक्त से आगे निकलकर जी गया
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया । 
 
हम नही रोयेंगे ये वादा किया था आज लेकिन
आसमाँ शामिल न था इसमे,  बिचारा रो गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

संगदिलोमे आपका चलता रहेगा कारवाँ
एक सूरज आज बस यूँ मुस्कुराहते ढल गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

---आदित्य 

कर्ज

क्षणाक्षणाला श्वास उरातुन भरतो आहे
असे कोणते कर्ज फेडण्या जगतो आहे

हात पसरुनी जगणारा नशिबाचा कैदी
भीक मागुनी रोज नव्याने मरतो आहे

सहवासाचे तेल संपले तुझे नि माझे
दिवा तरीही हृदयामधुनी जळतो आहे

सवय जाहली आहे अश्रूंना दु:खांची
उगी कोणता थेंब बरे हा रडतो आहे?

मुक्त जाहलो जरी माझिया शरीरामधुनी
तरी वाटते आहे थोडा उरतो आहे

श्रावणातल्या ओल्या प्रेमाला मुकलेला
ढगांतला पाउस कोरडा झरतो आहे

--आदित्य

Friday, March 13, 2015

आठवणींच्या कट्ट्यावरती

आठवणींच्या कट्ट्यावरती बसून येतो
हसून येतो, कधी मोकळे रडून येतो 

विझू लागता निखार जळत्या धूनीमधले
श्वास उबेचे भात्यामध्ये भरून येतो 

तुझ्या स्मृतींची पाने वाऱ्याने उलगडता 
गंध फुलांचा तिथे अचानक कुठून येतो?

जिथून गेलो सोडुन अल्लड निखळ क्षणांना
तिथेच आता  दुनियाभरचे फिरून येतो 

रोजरोजची सगळी कटकट विसरुन पुन्हा 
नव्यानेच मी स्वप्ने  गोळा करून येतो 

कणाकणाने रोज स्वत:शी मरता मरता 
क्षणात सारे  कट्ट्यावरती जगून येतो 

---आदित्य  

   

Friday, February 13, 2015

नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले


नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले
स्वप्नांमधले अर्थ नेमके पुसून गेले

तगमग देखिल उरली नाही भेटीपुरती
दोन कोरडे थेंब मात्र मुसमुसून गेले

ग्रहण कोणते, कधी लागले कळले नाही
प्रश्न मात्र कायमची हुरहुर लावुन गेले

रोप लावले होते आपण अनुरागाचे
नवी पालवी येण्यापुर्वीच मरून गेले

तुला शोधण्या माझे डोळे कितीतरीदा
अनोळखी चेहऱ्यांच्या मागे धावून गेले

चिता लागली नाही मजला जळण्यासाठी
मी विरहाच्या वणव्या मध्ये जळून गेले

---आदित्य 

Thursday, February 12, 2015

हुंदक्यांची वादळे


खोल दडलेल्या प्रतापी सागराला  जाण आता
घेतलेल्या हुंदक्यांची वादळे तू आण आता

ओढ प्रत्यंचा मनाची गर्जुदे आवाज त्याचा
थांबले आहेत भात्यातील  सारे बाण आता

पेटवोनी दे मशाली तेल घालुन आसवांचे
जाळ अंधारास आणिक सूर्य पुन्हा आण आता

प्राक्तनाला ठेव तारण, निग्रहाचे लाव तोरण
मनगटाशी तारकांचे बांधुनी संधान आता

---आदित्य 

Wednesday, February 11, 2015

झूम उठेगी शराब


हाथ लगाके देखो तुम इन प्यालोंको ये बह जाएंगे
झूम उठेगी शराब के अब होंठ आपके छू जाएंगे

नजरोंसे ही नशा दिला दो, जी जाएंगे उम्र हमारी
नजरोंसे ही जहर पिला दो, खुशी खुशी से मर जाएंगे

ख्वाब देखके रातोंको हम दिल को ये समझाते है
ख्वाबही सही, रूबरू कही, आप सामने आ जाएंगे

रिश्तोकी रंजिश मे और दुनिया की गर्दिश मे आखिर
हमे आजमाकर तो देखो, रूह छोडके आ जाएंगे

यही तमन्ना है के निकले जान आपके पहलुमे ही
इसी बहाने आसू मेरी प्रेम कहानी कह  जाएंगे

-- आदित्य

Tuesday, January 6, 2015

पाणी होऊन जगता जगता

रंग कुणाचा, ढंग कुणाचा लेउन पुरता हरवुन गेलो 
पाणी होऊन जगता जगता मर्म स्वत:चे विसरुन गेलो 
 
मल्हाराचे स्वप्न पाहुनी उत्साहाने जरी नाचलो 
थेंबा थेंबा मधून नुसते रडून निव्वळ वाहून गेलो 
 
बोलायाचे होते तेव्हा शब्द जसे विरघळून गेले 
ती गेल्यावर,गूज मनाचे स्वत:शीच मग बोलून गेलो 
 
तेढ तेवढी नाही आता समाधान मज याचे  की,
आठवणींच्या जखमांचे मी हिशोब चुकते करून गेलो. 
 
आयुष्याची नशा पुरेशी घोळून उरता रिक्त शेवटी 
उरले सुरले पेल्यामधले सत्य तेवढे रिचवून गेलो 
 
किती दाबुनी  ठेवू वादळ, दर्या  तुमच्या भिंतीमागे 
नका म्हणू मग नंतर सारे गाव बिचारे बुडवुन  गेलो !
 
---आदित्य 

Friday, November 28, 2014

भैरव

भल्या पहाटे एक सिद्ध पुरूष डोळे मिटून समाधिस्थ बसला आहे. न जणो गेली कित्येक वर्ष असा असेल.  वाढलेल्या जटा त्याच्या सिद्धतेचा पुरावा देणाऱ्या. कोरीव चेहरा, सावळा काळा रंग, भव्य कपाळ, दाढी मिशांमध्ये झाकलेल्या जखमांच्या खुणा, भक्कम शरीर त्याच्याकडे नजर खिळवून ठेवतात. गळ्यातील मुंडक्यांची माळ थोडी विचित्र भीती निर्माण करून झाते. एखादे भयंकर युद्ध खेळून येउन प्रलय, विनाश आणि संहार या त्रिशूळाला शांत करत आहे असं वाटतं.
क्षितिजाला चिरत एक वीज चमकून जाते आणि तो डोळे उघडतो. काळाच्या पलीकडे पाहणारे त्याचे ते तांबूस डोळे थेट हृदयाचा वेध घेतात . करारी पण शांत डोळे. समाधानी नजर, पण प्रलयानंतरच्या शांततेचं प्रतीक असलेली. हातात त्रिशूळ घेउन तो उभा राहतो तेव्हा अख्खी सृष्टी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असं वाटतं. समुद्राची शांतता आणि उग्रता दोन्ही त्याच्या मूर्तीत सामावलेल्या दिसतात. त्याची पूर्व क्षितिजावर नजर जाते. जणू सूर्याला उगवायची संमती देत आहे अशी. सूर्य नारायण देखील आपली पहिली किरणे त्याच्या चरणी अर्पण करतात. आशीर्वाद देऊन, मंद स्मित करून हा सिद्ध पुरूष अंतर्धान पावतो. सृष्टीची नांदी करून गेल्यासारखा. माझे डोळे मिटतात. समाधानाने ओले होतात. अस्तित्वाला आशीर्वाद देणाऱ्या त्या सिद्ध पुरुषाला मी मनोमन वंदन करतो. सृष्टी आणि विनाशाची काळात गुम्फ़ण करणारा हा भैरव. कोटी कोटी प्रणाम.

Tuesday, November 25, 2014

वल्गना


भावनांना जिंकण्याची वल्गना करता कशाला
दोन डोळ्यांतील पाणी लपवुनी फ़िरता कशाला

केवढी नाजूक नाती बांधुनी असतात धागे
उसवुनी मुद्दाम त्यांना फसवुनी शिवता कशाला

चमकणारे चेहरे लेउन रात्री रोज ऐसे
मुखवट्या आडून सूर्याच्या पुढे लपता कशाला

अर्थ सारा संपल्यावर शब्द ना उरतोच तेथे
कागदावर फक्त शाई एवढे उरता कशाला

ठेंगणे कर्तृत्व सारे अंध नशिबाच्या समोरी
आंधळ्याने आंधळी वहिवाट मग धरता कशाला


---आदित्य

Monday, November 24, 2014

तेरे नैना

तेरे नैना छुप छुप के
जो बातें मुझसे करते हैं
छू जाती हैं दिल को लेकिन
होंठ सिले ही रहते हैं

इन आंखोकी गहराईमे
गिर जाए ना चाँद कहीं
झील के किनारोंपे देखो
तारे पहरा करते हैं

खो जाता हूं कहीं न जाने
नीली नीली झील जानने
अनजाने खाबोंके रस्ते
वहीं कहींसे गुजरते हैं

याद है मुझे शाम सुहानी
आसमानसे शरमाती थी
उसी शाम के रंग सिमटकर
जजबातोंको संवरते  हैं

कह भी दो अब आँखोसे तुम
हाँ या ना जो भी सो हो
दीदार आपका  हो जाए,
बस यही तमन्ना करते हैं


---आदित्य


 

Friday, October 31, 2014

परछाई

परछाईयों से डरता हूँ
पर उनकेही संग रहता हूँ
कभी दूरसे कभी पासमे
उनकेही संग चलता हूँ

डर जाती है अंधेरेमे
परछाई, और छुप जाती है
दिया जलाके रिश्ता अपना
और उजागर करता हूँ

शाम डूबती परछाईको
ले जाएगी दूर जहां में
वही कही वो बस जाती है
मैं एक तनहा सो जाता हूँ

सूरज की परछाई भी
खो जाती है किसी शहर में
सूरज बन के उस सूरज को
कुछ परछाई दे देता हूँ

-- आदित्य 

गाफिल


डोळ्यांदेखत मनास चोरून नेले पुरते
हृदय आजच्या इतके गाफिल कधीच नव्हते

ठोका चुकला तेव्हा कळले धोका झाला
कटात हृदयाचे धडधडणे सामील  होते

रोज स्वत:ला समजावून मी सांगत असतो
रोज नेमकी नजर तिच्या नजरेशी भिडते

कसे कळेना हुरहुर वाटे हवी हवीशी
कसे कळेना तिचेच हसणे स्वप्नी दिसते

--आदित्य
 

Tuesday, October 28, 2014

ठेच


मनास माझ्या थांबायाला सांगत नाही
ठेच लागुनी पडलो तरीही लागत नाही

वारा वादळ पिउन निघालो सूर्य गिळाया
तसे एवढ्यानेच पुरेसे भागत नाही

शब्दांना मी भावनांमध्ये म्यान करवतो
परी धार पिंजऱ्यात राहणे मानत नाही

भूक जाळण्यासाठी इंधन नकोच आता
झॊप तशी भरलेल्या पोटी लागत नाही

सावर आता जरा स्वत:ला, रोज सांगतो
तोल फक्त सांभाळुन नुसते चालत नाही

मनस्वितेची गुलाम सवयी आणिक व्यसने
उपभोगुनही बुद्धी आता बाधत नाही

--- आदित्य
 

Wednesday, October 22, 2014

दिवे लागले

मूक मनाच्या अव्यक्ताला 
अस्तित्वाचे तेज लाभले 
अंधाराच्या पणतीमध्ये 
चैतन्याचे दीप लागले 

कर्माच्या पुण्याईवरती 
लकेर आशेची अवतरली 
काळ स्मृतीतुन मागे सरला, 
तमास जाळुन तेज दाटले  

उन्मेषाची ज्योत कोवळी 
मोहक सृजनाने थरथरली 
ओंजळीतुनी जणू स्वत:च्या 
आनंदाचे अर्घ्य पाजले 

स्वर्गातुनही तारे येती 
खेळ खेळण्या पृथ्वीवरती  
खळखळते तेजामृत अवघ्या
मनी मनी उस्फूर्त वाहिले

दीप उत्सवामध्ये येथे 
प्रत्येकाची ज्योत तेवते 
हृदयामधले गीत सांगते 
दिवे लागले दिवे लागले

--- आदित्य 

Friday, October 17, 2014

तरंग


खडा टाकता पाण्यामध्ये कितीक उठती तरंग तेथे
निळे बुडबुडे सोडुन जाती भूतकाळचे तवंग तेथे

गहिऱ्या पाण्यावरती येती आणिक जाती कितीक लाटा
घेऊन येती स्वप्नांना अन ठेऊन जाती उमंग तेथे

कधी वादळे कधी उन्हाळे कधी धुक्याचे खेळ निराळे
तरी धरूनी असेल आशा आयुष्याचा पतंग तेथे

कडू तिखट ताटाचे जेवण रोज लाभते यथेच्छ येथे
परी शोधतो दोन घडीचा खाऊ थोडा खमंग तेथे

अशी कोठली शर्यत येथे पळतो आहे सदा सर्वदा
जिथे थांबतो पळता पळता उभा ठाकतो तुरुंग तेथे

अंधाराच्या वलयामध्ये नव्या नशेने पेटून उठतील
हजार डोळे, हजार जिव्हा, हजार वृत्ती सवंग तेथे


--- आदित्य

 

कधी जायचे

भविष्य केवळ रेघांमध्ये सोडुन  गेली
असी कशी आशाच निराशा करून गेली

'कधी जायचे' स्वप्नामध्ये काळ म्हणाला
'उद्या' म्हणोनी वेळ आजची मारून नेली

लाखांचीही उरली नाही फिकीर मजला
पैशांनी नात्यांची जेव्हा चिता मांडली

भले रोज मी नीटनेटका असतो तरिही 
घडी मनाची रोजरोजची विस्कटलेली

कधी वेळ सांगून का येते कोणावरती
हयात सारी वाट तिची बघण्यातच गेली


--- आदित्य

Tuesday, March 26, 2013

खबर

आज उनकी खबर ने जिंदा किया हमे
यादोंकी  गहराई में दफना  दिया हमें

कुछ तो सुकून मिला एक पलभरही सही
पलभर की ही बारिश ने गीला किया हमें

नहीं समझा सके इन आंखोकी नमी को
यही कहा दिल ने 'क्यों रुला दिया हमें?'

सहमेसे इस दिल ने अब पत्थर बनके
गीली गीली यादोंसे बस पर्दा किया हमें

----आदित्य

Saturday, March 23, 2013

वाहतो असाच मी

वाहतो असाच मी एक ओंडक्यापरी
ना प्रवाह थांबतो, हा प्रवास जोवरी

मावलो कुठेच ना, भंगलो जिथे तिथे
सांडलो कुठूनसा, वाहतो कुठेतरी

ठाव ना मला इथे मी कशास राहतो
मार्ग थांबती जिथे, थांबतो अशा घरी

एक तू पुन्हा पुन्हा तेच दान टाकतो
एक मी पुन्हा पुन्हा त्याच त्या पटावरी 

'मीच एकदा अता सोडतो कधी मला '
एवढाच काय तो प्रश्न खोल अंतरी 

-----आदित्य

Wednesday, June 27, 2012

एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
मैं  साथ नहीं रह पाऊंगा
मैं देख सकूंगा  तुझको 
लेकिन साथ नहीं दे पाऊंगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
दो आंसू  होंगे आंखोंमे
फिसल गिरेंगे गालोंपरसे
मोती बनके हाथोंमे
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
सब  मिट्टीमें मिल जायेगा
फिर उभरेगा जो पौधा
वो आसमान छू जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
जब आँखे अपनी बंद करोगे
मन की आँखे धुल जायेगी
जग उजियारा दिखलायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
हम सूरज खुदका बन जायेंगे
रोशन होंगी मंजिल अपनी
और अंधेरा मिट जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
हम और नहीं गिर पायेंगे
फैलाके पंखोंको अपने
उडनाही रह जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा 
 
आदित्य 

Monday, June 25, 2012

जंगलातली गंमत

जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मासे होते झाडावर अन् उडत होत्त्या गाई
मी काय सांगू आई

वाघोबाला फुटली होती हत्ते एवढी सोंड
जिराफ होते लावून काळे कोल्होबाचे तोंड
ससे छोटूले झाले होते लांडगोबांच्या एवढे
हरणाने तर दात लावले होते केवढे केवढे
नदी रंगली होती जैसे पेनामध्ये शाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

उंटाने भर उन्हामध्ये घातला होता स्वेटर
सिंह होते हाटेलातील गरीब बिचारे वेटर
उंदीरमामा घोड्यासंगे मारत होते दुडक्या
झाडामध्ये केल्या होत्या छोटया छोटया खिडक्या
कासवदादा पळत होते कसली होती घाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मोठी मोठी शिंगे होती चित्ता महाशयांना
चार पाय फुटले होते अजगर महाराजांना
अस्वल होते सरपटणारे काढे मोठा फणा
माकडचाळे सोडून माकड शिकवे शहाणपणा
मगरी म्हणती मजला आता पोहता येत नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मला देखिल आले होते एक हिरवे शिंग
आणि होते अंगावरती काळे पांढरे रंग
आली केवढी डरकाळी मी आ करता नुसता
सारे जंगल गायब झाले हा म्हणता म्हणता
कमी येथे मजला आता कसली म्हणता नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मी काय सांगू आई


आदित्य

दान मागतो

तुझिया चरणी ठेऊन माथा दान मागतो तुजला
दे बुद्धी, दे शक्ती, दे ज्ञान निरंतर मजला
मी दान मागतो तुजला

चराचराचा तूच विधाता
तू करुणा अन् तूचि त्राता
अखंड माया मोह प्रपाता
भवसागर हा तरावयाला वरदहस्त दे मजला
मी दान मागतो तुजला

वज्रापरी दे छाती आम्हा
खड्गाची वैखरी असू दे
शौर्याची देवता वसू दे
अंधाराचे फाटून पडदे ज्ञान मिळूदे मजला
मी दान मागतो तुजला

आदित्य

बंद कोनाडा

बंद कोनाडा कधीचा किर्र अंधारून आहे
दु:ख ज्याचे तो उराशी खोल सांभाळून आहे

पावसाशी भांडणा-या बोडक्या उघड्या घरांची
भिंत, द्वंद्वाची कहाणी अन् खुणा राखून आहे

झाड उरले काटके गाळून सारी एक पाने
हे उभे असले तरी नि:शब्द प्रेत म्हणून आहे

कोण जाणे काय होतो मागल्या जन्मी कुणाचा
वाटते की मागले काहीतरी साठून आहे

भोवतालीच्या सुखांना सांग तू, दरडाव थोडे
की म्हणावे दूर जा दु:खात मी मश्गूल आहे

आदित्य

मैत्र

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

उडू बागडू दिशात दाही
साथ आमुची सदैव राही
पुढे न मागे कुणी आमुच्या
मनमर्जीचे राजे आम्ही

खांद्यासंगे भिडवू खांदा
दिवस रात्र हा एकच धंदा
सावलीपरी दुजा संगती
लपंडाव साकारू आम्ही

कधी पायरी घसरून पडलो
चालत जाताना अडखळलो
हात पुढे सरसावून होतो
एक एक पारंबी आम्ही

भावनांतुनी विरघळताना
मनात अलगद हुरहुरताना
अवघडलेल्या शब्दांसंगे
ओझरणा-या धारा आम्ही

तरंगणा-या बेटावरती
अशी  उमलती नाजुक नाती
तुषार उडवू, फुलवत राहू
मैत्रीची कारंजी आम्ही

असे ऋतूही कधी उगवतील
उजाड रानी कोणी नसतील
तरी दाखवू दिशा दुजाला
चंद्र होऊनी नभात आम्ही

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

आदित्य



जिंदगी कंटाळली

वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली

झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली

ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली

सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली

आठवावी लागली म्हणतेस अपुली भेट 'जी'
एवढया गर्दीतही मी 'ती' स्मृती सांभाळली

दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली

वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली

आदित्य  

मैं रंग चुरालूं पानीका

काली बदरा जल बरसाये
बूंदोके त्योहार सजाये
इस सावन भरी कहानीका
मैं रंग चुरालूं पानीका

मन मतवाला महक उठा है
पंछी बनके चहक उठा है
गीली खुशबू और सुरोंमें
रंग भिगौके झूम उठा है

अब रंग कहां? ये ढंग बना
जिस हाथ लगा, वो संग बना
इस सावन भरी रवानी का
मैं रंग चुरालूं पानीका\


आदित्य  


 

फूल खिला है आंगन में

कोयल कूक लगायेगी और
तितली भी मंडरायेगी
फूल खिला है आंगन में
हर सांस महकसी जायेगी

हर सावन पिछला रुखा था
कुछ गीला था कुछ सूखा था
अब बारिश ऐसे आयेगी
बस खुशियाँही बरसायेगी

बूंद बूंदसे गीत गिरेगा
गीत गीत से मन झूमेगा
प्यारी बतिया लोरी बनके
किन सपनोंमें खो जायेंगी

चांद सितारे रातोंको
एक नयी कहानी लायेंगे
नन्ही कोमल एक परी
मीठीसी गुनगुन गायेगी

प्यार भरी बूंदोंकी झालर
गालोंपरसे आ फिसलेगी
नन्ही नाजुक एक कली जब
पंखुडीयोंको फैलायेगी

आदित्य

Monday, September 19, 2011

खुणा

तुझ्या पुस्तकामध्ये 
जेवढी पाने असतील
प्रत्येक पानावरती 
माझ्याच खुणा दिसतील

गहिरे कागद वाचून 
काळीज ओले होता
शब्दांच्या माझ्या चिंध्या 
डोळ्यांच्या काचा पुसतील

माझी सारी स्वप्ने 
इथे स्वत: मी पुरली
इथेच आता त्यांची 
भुते नव्याने उठतील

तुझ्या सोहळ्यासाठी 
बरेच येतील, गातील
शब्दांच्या गर्दीमध्ये 
पण अर्थ तेवढे नसतील

जखमा पुसल्या जातील 
अश्रूंच्या  टपटपण्याने 
हृदयाच्या अंधारातील 
घाव मात्र चुरचुरतील

कशास पुन्हा काढू 
तुझी जुनी ती पत्रे
स्मृती विरूनी जातील 
नि भास उशाशी उरतील

आज भले तू गेलीस 
सोडून एकटे मजला
पण माझ्या असण्यासाठी 
तुझेच क्षण हुरहुरतील

----आदित्य देवधर

Sunday, September 18, 2011

हत्या

मुक्यानेच ती जाता जाता रडून गेली
माउली तिला कशी एकटी टाकून गेली

डाव साधला ऐसा या दैवाने देखिल
कळी बिचारी फुलण्याआधीच खुडून नेली

तेजस्वी गंधाने पोटी दरवळणारी
ज्योत  देखणी पाण्यामध्ये विझून गेली

चैतन्याची धार वाहिली उगमातुन पण,
सृजनाची ती नदी कोरडी आटून गेली

गळा घोटला तिचा तिच्या जन्माच्या आधी
आमच्याच आईची जैसे हत्या केली

ती जोडून होती तुम्हास तुमची सृष्टी होऊन
नाळ तिच्या सृष्टीची का हो कापून नेली

--आदित्य देवधर

Wednesday, May 25, 2011

मोक्ष

मी:  देवाला अजूनही असं वाटत नाही कि माझं काम संपलंय?
       रोज येऊन विचारतो खरा!
तो:  अजून याला तिथेच राहुदे की संपलंय याचं काम ?
       संपलंय असं वाटतंय खरं !

मी व तो :  कधी मिळणार आहे मला मोक्ष?


----आदित्य देवधर

Friday, May 20, 2011

मायेचा हात

पडते इवले पाउल आणिक
ठसे उमटती सान कोवळे हृदयावरती
भिरभिरणारे डोळे बघता
तरळून जाते पाणी अलगद डोळ्यांपुढती

श्वास उतरती-चढती , देती
अस्फुट हुंदके थरथरत्या ओठांच्या मधुनी
साद घालती बोल बावरे
कवटाळून घेण्यास उराशी अंगावरती

नाजुक नाजुक कळीप्रमाणे
बंद कोवळी मूठ सांधती इवली बोटे
फूल उमलता मंजुळ रावे
भिरभिरती स्वप्नांना घेऊन पंखावरती

चंचल डोळे ओले बघुनी
होतो अपुला जीव कापरा कधी घाबरा
आणि पुसटसे हासू देखील
घेऊन जाते मनास अपुल्या स्वर्गावरती

किणकिणता पायांतील वाळे
नाद मनोहर कानांपाशी करिती गप्पा
उन पावसापरी बहरते
हसरी रडकी राग रागिणी हृदयाभवती

कधी खेळणे वाटे मजला
कधी लाघवी उशी शेवरी मउमऊशी
स्वप्नांतून ते रमून जाते
मायेचा मम हात ठेवता पाठीवरती


----- आदित्य देवधर

Tuesday, May 17, 2011

हसून पाहशील का

हसून पाहशील का वळून एकवार तू
भरून वाहशील का उरात प्रेमधार तू

बळे जपून ठेवले मनास कोंदणात मी
कटाक्ष एक टाकता क्षणात आरपार  तू

मधाळ हासता कधी मला खरेच भासते
नितळ चांदण्यातली झुळूक थंडगार तू

जरा कुठे विसावता तुझेच स्वप्न पाहतो
तुझ्यासवे सुखावतो, मनातला ऋतू ऋतू

जरा कुठे कधी भिडेल नेत्र दोन चारदा
क्षणात रोखुनी त्या कट्यार धारदार तू

सुरेल गाउनी करे विहंग वाहवा तुझी
वसंतही तुझ्याविना झुरे अशी बहार तू

कधी उदास वाटता, उरात भाव दाटता
उभा समोर ठाकतो, कधी मला पुकार तू

---आदित्य देवधर

याद

एक ही चेहरा हमें बस याद आये
दर्द का एहसास जब भी याद आये

भीतरी कोनेसे उठकर रो पडा गम
आँसुओ में मुस्कुराना याद आये

ढूंढ के हम थक गए दिल को हमारे
प्यार का उठता जनाज़ा याद आये

भूलके भी रात को सोते नहीं जब
ख्व़ाब को दिल से मिटाना याद आये

तरसा किये थे आपके दीदार को हम
यादको ही याद करना याद आये 

---आदित्य देवधर 

Thursday, April 7, 2011

आपसे रुसवा न हमको कीजिये

जिंदगीभर दिल दुखाया है तुम्हारा
एक बस मौका हमें अब दीजिये
आपसे रुसवा न हमको कीजिये

रूठकर यूं छोड़के जाओ न हमको
जिंदगी से तोड़के जाओ न हमको
क्या करेंगे हम तेरे बिन, सोचिये
आपसे रुसवा न हमको कीजिये

क्या कहूं मजबूर था मैं इस कदर के
कह न पाया राज-ए दिल का चाहकरके
दर्द ए दिल कि ये जुबाँ सुन लीजिये
आपसे रुसवा न हमको कीजिये

आँख यादोंसे मेरी ऐसे भरी है
रात आंखोसे उतर ऐसी जली है
आगोश में अपने हमें बस लीजिए
आपसे रुसवा न हमको कीजिये 

-----आदित्य देवधर

Wednesday, April 6, 2011

आज मी झालो जुना

केवढी वर्षे उडाली 
आज ते कळते पुन्हा  
मी कधी चैतन्य होतो 
आज मी झालो जुना

आठवोनी सांग मजला 
मी नवा होतो कधी 
की नवा नव्हतो कधी 
अन जन्मलो ऐसा जुना 

देवही मजला म्हणाला 
'रे भल्या झिजला कसा तू 
शेकडो शतके उलटली 
मी कधी झालो जुना ?'

लावुनी देतील मजला
कोण पाटी अनुभवाची
कोण येऊन घालतील मज
हार मळका अन जुना

हे जुने सोने म्हणोनी 
मी आता हसतो स्वत:शी 
मिरवतो मोठे नव्याने
मी जरी झालो जुना 

------ आदित्य देवधर

मेरा मन

क्यूं नहीं लागे मेरा मन
क्यूं कहीं भागे मेरा मन
देखलो शायद वहीं पे
आह भरता हो मेरा मन

उड़ चले वो चाँद छूने
चांदनी की सेज बुनने
सो वहीं जाए अकेले
देखके सपने मेरा मन

एक बर्फीले जहां में
धुंद गीले आसमाँ में
बादलों में घर बनाके
बूंद बन जाये मेरा मन

एक तितली बनके आये
आप, और बस चल दिए
दो घड़ी रुकते ज़रा और
ले चले जाते  मेरा मन 


---------आदित्य देवधर 

Thursday, March 31, 2011

जगण्याची ही मौज निराळी

जगण्याची ही मौज निराळी
मुक्त उडावे चिर आभाळी
तुडवून शिखरे उंच ढगांतील
लेऊन घ्यावे चंद्र कपाळी
हे जगण्याची मौज निराळी

हर रातीची नशा पिऊनी
अंधाराशी डाव मांडुनी
वळवू फासे मनाप्रमाणे
जिंकू अस्तित्वाची खेळी
हे जगण्याची मौज निराळी

झटणा-याचे हात बनू अन
उडणा-याचे पंख बनू
नाठाळांना वज्र बनोनी
हाणू दंडे भ्रष्ट कपाळी
हे जगण्याची मौज निराळी

एक वस्त्र भगवे अन हाती
निधडी शस्त्रे, निधडी छाती
मनगटावरी बांधून तारे
भिडू सर्वदा काळोखाशी.
हातावरच्या आखू रेषा
अमुच्या आम्ही, या आवेशा
मशाल देउ स्वातंत्र्याची
बंड उभारू चंडाळाशी
शपथ घेउनी अशी निघालो
आदित्याला स्मरून निघालो
लोळ वन्हीचे उडवून जाळू
घोर पिशाच्चे काळी काळी
हे जगण्याची मौज निराळी
तुडवून शिखरे उंच ढगांतील
लेऊन घ्यावे चंद्र कपाळी
जगण्याची ही मौज निराळी

---आदित्य देवधर

Monday, March 28, 2011

उम्मीद

मंजिलें लुटती गयीं और
फासलें भी बढ गए
चुटकीसी उम्मीद लेके
हौसलें फिर बन गए

शाख से पत्ते गिरे और
आँख से मोती गिरे
कुछ वहा मिट्टी बने और
कुछ बहारे बन गए

सह लिए हैं जुल्म इतने
बस तुम्हारी चाह में
दर्द से ऐसे जुड़े
हम-दर्द तेरे बन गए

ये कहाँकी बाढ़ है
जो ले न जाए कुछ कहीं
तेज ऐसी धार में बस
गम पुराने धुल गए

---- आदित्य देवधर 

जिंदगी

धूप में जलती जलाती और रुलाती जिंदगी
शाम को पलकोंके नीचे मुस्कुराती जिंदगी

दर्द में भीगी हुई बाती चिरागों में जले
इस बुझीसी जिंदगी को ही बुझाती जिंदगी  

रो रहा हो आसमाँ तब, जी उठे सारा जहां
बारिशों की धार में रोती भिगोती जिंदगी

एक ऐसा दिन भी आए जो जिए सालों कईं
एक ऐसी जिंदगी से दिल लगाती जिंदगी

रोशनी की ले सवारी, चल पडी जाने कहाँ
बंद मुठ्ठी से निकलके सांस लेती जिंदगी

---आदित्य

Friday, March 25, 2011

निर्माल्य

आता आलीच आहेस
तर हे निर्माल्य घेऊन जा

सुकलेल्या थंड कळ्या
थोड्या रिकाम्या करून जा

एक एक पाकळी आता
एक एक वेदना झाली आहे

बघ जमत असेल तर
थोडं ओझं कमी करून जा

----आदित्य देवधर 

प्रेम उपाशी

शब्दांच्या गर्दीत तेवढे 
प्रेम राहिले फक्त उपाशी
तरी हासतो चेहरा आणिक 
कोसळतो पाऊस मनाशी

झडून गेले शब्द पिसारे 
पान पान तुजला लिहिलेले
हळूच उलगडता ती पाने 
रिता  होतसे अभ्र उशाशी

अनोळखी नजरांची मजला 
सवय अताशा झाली आहे
शोधत बसतो गर्दीमधुनी 
दिसते का तू कुठे जराशी

काय म्हणोनी तुज मी मागू, 
तुझेच होते सारे काही
हृदय तेवढे फक्त असू दे 
तुझे एकटे माझ्यापाशी

काल अचानक दिसली मजला 
आठवणींचा वणवा उठला
ओळख पटता तुला तयाची 
चर्र जाहले खोल मनाशी

उरली आता पळे थोडकी 
असा निघालो सोडून तुजला
डोळ्यामधले चंद्र चांदणे 
गाळशील का जराजराशी

----आदित्य देवधर 

क्यूं चाहता है मन मेरा

क्यूं चाहता है मन मेरा
तितली बने, उड़के चले वो
बादलोंको चूमने और
भीग जाए मन मेरा
क्यूं चाहता है मन मेरा

सात रंगों में समाके
रंग की दुनिया बनाके
ले चले अपने परोंपे
रंग जान-ए  मन मेरा
क्यूं चाहता है मन मेरा

रोशनी की झील में, हर
शाम को डुबकी लगाके
बूँद किरनोंकी पिलाके
डूब जाए मन मेरा
क्यूं चाहता है मन मेरा

ले चला मैं रात के
रंगीन सितारे टिमटिमाते
बादलोंसे दूर, दुनिया
को बसाए मन मेरा
क्यूं चाहता है मन मेरा

-------आदित्य देवधर 


Tuesday, March 15, 2011

असेन मी ..

नसेन मी तुझ्यासवे
तरी तुला जपेन मी
तुझेच गीत होऊनी,
सुरांतुनी दिसेन मी.

मोहरेल अंग अंग,
येत सोहळा वसंत
रंग रंगुनी नवे
कळी कळी फुलेन मी

कृष्णकांत येत मेघ,
तहानली धरा भिजेल
थेंब थेंब होऊनी
उरातुनी झरेन मी

बीज एक अंकुरेल,
पालवी नवी फुटेल
स्पर्श कोवळे करून,
कोवळे हसेन मी

शेवटी उरेल काय,
श्वासही उडून जाय
सूर्य होऊनी स्वत:
तुझ्या तिथे असेन मी

इथे न मी, तिथे न मी
तरी तुला बघेन मी
शोधसी असा मला
कधी तुला कळेन मी?

---- आदित्य देवधर

एकदातरी

मजकडे बघायचेस वळून एकदातरी
दाखवायची मिजास म्हणून एकदातरी

वाद घालुनी बरेच रुसून जायचो मुळी
चोरुनी पहायचेस चुकून एकदातरी

तुझ्याच मैत्रिणीकडे बघून हासता कधी
राग राग व्हायचेस जळून एकदातरी

कितीकदा दिली तुला प्रिये तृषार्त हाक मी
मिठीत यायचेस विरघळून एकदातरी

भेटलो तुला जिथे तिथेच येत राहिलो
पुन्हा तशीच भेटशील म्हणून एकदातरी

आड आडुनी मला पहायचीस, जाणतो.
लाजुनी हसायचेस लपून एकदातरी

लिहीत राहिलो उदास, मूक प्रेमभावना
एक ओळ व्हायचेस हसून एकदातरी.


-----आदित्य देवधर 

Monday, February 21, 2011

अभंग पामराचे

आज अमृताचे डोही
मन आनंदे न्हाइले
मन भरोनिया तुझे
रूप सुंदर पाहिले

दोन डोळियांची माझी
सार्थ झालीया प्रार्थना
ओघळती गंगधार
सुख नयनी मावं ना

माझा गुरू माझा ईश
तूच माझा मायबाप
दर्शनाने आज तुझ्या
टळे सर्व कष्ट ताप

त्राण नाही पायी माझ्या
पोटामध्ये कण नाही
सुचते ना मज काही
काय मागू काय नाही

माथा ठेऊन चरणी
मज मिळे समाधान
नांदे इथे चराचर
कुणी थोर कुणी सान

याच तुझ्या दर्शनासी
माझा घडू दे प्रवास
माझे वैकुंठ इथेच
माझे इथेच कैलास

देई पामरास शक्ती 
भवसागर तराया
नाम तुझेच राहुदे
माझ्या मुखी देवराया

----- आदित्य देवधर

उतरती उन्हं

तिरीप रेंगाळून उन्हाची ओल्याने सळसळून जाते 
गंध केशरी लावून भाळी, लाटांतुन विरघळून जाते

मंद हासुनी क्षितिजावरती, ध्यानमग्न गंभीर जळाशी
खेळत खेळत बिंब मनोहर लाटांतुन खळबळून जाते

आठवणींचे जुने पिसारे पुन्हा उमलता मनी नव्याने
लाट मोकळी हासत हासत हृदयाशी खळखळून जाते












थवे दूरचे क्षितिजावरचे करिती स्पर्धा लाटांसंगे
वेचुन ऐशा माळा संध्या, गळी कोवळ्या माळून जाते

मऊ मऊ वाळूत खोडकर पाय नाचता संध्यासमयी
ठसे उमटती, वाहून जाती, सत्य केवढे कळून जाते.

एक एक लाटेच्या संगे खेळ चालती लोभसवाणे
खोड काढुनी पायांपाशी, घेऊन गिरक्या पळून जाते

खा-या खा-या चवीत ऐसे शहारणारे खारे वारे
पदर उडविता तुझा,  मनोमन नजर तुझ्यावर भाळून जाते

दोन तेवढी प्रेम पाखरे दूर बैसती बेटावरती
यौवन तेथे नव्या दमाने वा-यावर सळसळून जाते 

हातांमध्ये हात तिचा अन डोळ्यांमध्ये तिचेच रुपडे 
श्वास तेवढे निव्वळ बाकी,  अंतर सारे गळून जाते.

किनार ऐसी समुद्रतीरी लेऊन ओली उन्हे उतरती,
भाव भावना दाटुन येता, हृदय मुके कळवळून जाते 

----- आदित्य देवधर

Tuesday, February 15, 2011

पोरके अनुबंध सारे

पोरक्या  खिडकीतुनी कोकीळ कोणाला पुकारे
मन्मनी काहूर माजे, पोरके अनुबंध सारे

ओल ना उरली कुठे हृदयात तुझियावाचुनी
कोरडे कारंज झाले, कोरडे झाले फवारे

शब्द देखील सोडुनी गेले पुराणी लेखणी
अर्थ ना उरले मुळी आता जरी लिहिले उतारे

पाय सोडून बैसलो असता नदीशी एकटा
घेउनी येती स्मृतींना बुडबुडे, स्फुरती शहारे

मूक मी अव्यक्त मी पण वादळे मन्वंतरी
वाहुनी कित्येक लाटा फोडती दगडी किनारे

"का असा उरलास मागे का असा झुरतोस मागे"
काळजाचा एक एक तुकडा फुटे, मजला विचारे

 ---- आदित्य देवधर 

तेवढ्यासाठीच

तेवढ्यासाठीच चोरून पाहतो चेहरा तुझा
आसवांना गाळतो की हासतो चेहरा तुझा

एवढे विनवूनही तू सोडुनी गेली अशी
आजही डोळ्यांसमोरी दाटतो चेहरा तुझा

आरशामध्ये बघूनी एकटा व्याकूळतो
त्यातही मागे कुठेशी भासतो चेहरा तुझा

आठवांच्या दूरच्या नगरीत मी जातो कधी
तेथल्या प्रत्येक दारी पाहतो चेहरा तुझा

दाटतो माझा गळा अन दाटते नयनी धुके
पत्रांतुनी जेव्हा लिहाया लागतो चेहरा तुझा

सोहळ्यांचे मुखवटे मी घालतो, तू भेटता
भावनांच्या झिरमिळ्यांशी खेळतो चेहरा तुझा 

----आदित्य  देवधर

Friday, December 31, 2010

पाठमोरी

पाठमोरी पाहुनी तिजला उभी माझ्यापुढे
ओढला गेलो कसा मजला कळेना तिजकडे
संमोहुनी जागीच मजला कापरे भरले तिथे
गोठलेल्या आसमंती वीज 'ती' देई तडे

केस होते लांब काळे गुंफली होती जुई
गंध दरवळता उसासे आतुनी सोडे भुई
हे कसे हुंकार होते की कुणाचे बोलणे
आणि मजला भासले होते शहारे जादुई

गौरवर्णी पावले होती तिची मऊ शेवरी
कोण ना मी पाहिली असली परी या भूवरी
डौल होता चालताना अन कमानी देह हा
वेड लावी या जिवाला, आतुनी जखमी करी

रानवेली गात होत्या गीत रातीचे जसे
धाउनी वारा कपारीतून शिळ घालीतसे
पाखरूही फडफडे चमकून तिजला पाहुनी
एक किंकाळी फुटे अन लांडगे वेडेपिसे

या अशा अंधार राती ही निघाली झरझरा
ती पुढे माझ्या नि मी मागे तिच्या आलो खरा
आसमानी चंद्र होता पाहताना नाट्य हे
तो मला सांगे ' भल्या , बघ लोभ हा नाही बरा.'

माझिया हातात नव्हते थांबणे आता मुळी
पाय होते चालले मागे तिच्या हिरव्या तळी
घेउनी ती जात होती मज कुठे बोलावया?
स्वागताला वाघुळे अन सर्प पायी सळसळी

शुभ्रवस्त्रा चालली होती कुणा वाडयाकड़े
दूरच्या काठावरी अन या तळ्याच्या पलिकडे
खोल जाता आतमध्ये शूळ उमटे बोचरा
अन तरंगे संथ पाण्यावर कुणाचे चामड़े

दूर दिसले लाल डोळे रोखताना मजवरी
श्वास माझे धडधडोनि  नजर होई घाबरी
हासती घुबडे फिरवुनी मान उलटी केवढी
दार वाडयातील मग जबडया प्रमाणे करकरी

आत जाता ऐकली मी हाक मंजुळ गोडशी
वाजुनी पैजण मला दावी दिशा जणु उर्वशी
अर्धमेले दार ढकलून मी जसा गेलो पुढे
आलिंगना होती उभी ती लाजुनी तेथे जशी

हनुवटी उचलून मी डोळ्यांत उतरून पाहिले
खोल गहिरे अन निळेसे जहर जैसे पाजले
लागलेले रक्त थोड़े लाल त्या ओठांवरी
दात विचकुन हासुनी मजला तिने न्याहाळले

ढकलुनी मजला ती माझ्या बैसली छातीवरी
रुतवुनी दातास मग घामेजल्या मानेवरी
उड़वुनी रक्ताळ चिळकांडया तशा अंगावरी
तडफडोनी शांत होता झोपली प्रेतापरी

आज पुन्हा पाहतो मी एक माझ्यासम उभा
वीजही होती तिथे करुनी किनारा वर नभा
रोखुनी डोळे उभा तो पाठमो-या तिजकडे
पाठमोरा मी तिथे होतो तिच्यासंगे उभा!!

------ आदित्य देवधर

Thursday, December 30, 2010

चूक झाली

सहन मी केले उन्हाला, चूक झाली
सावली झालो तुम्हाला, चूक झाली.

झेलताना गार वारे आणि गारा
पाजले पाणी तुम्हाला, चूक झाली

बंद करुनी वेदनांना खोल गात्री
'हासरा' दिसलो  जगाला चूक झाली 

खंत ना कुठली उराशी ना अपेक्षा 
कोरडे केले मनाला, चूक झाली

घातले पोटी चुकांना रोज तुमच्या 
दोष मी दिधले स्वत:ला, चूक झाली

भान ओवाळून उरलो देहमात्रे 
पारखा झालो जिवाला, चूक झाली

एकटा मी जागलो माझ्या प्रतिज्ञा 
देवही ऐसे म्हणाला 'चूक झाली'

तोंड वेंगाडून आला काळ जेव्हा
वाटले जगलो कशाला, चूक झाली.


------- आदित्य देवधर

Monday, December 27, 2010

तेवढे सांगा मला..

पाखरांनो दूर जा दाही दिशांना भोवताली
तेवढे सांगा मला माझी प्रिया कोठे निघाली

धाडली कित्येक पत्रे मारल्या कित्येक हाका
एकही प्रतिसाद ना आला,न कुठली हाक आली

एवढे का रागवोनी जायचे सोडून मजला
एवढी गे काय मोठी चूक मज हातून झाली

श्वास माझे भारले होते तिच्याशी बोलताना
वाहतो माझ्याच श्वासांची अता ओझी, हमाली

थांबती वाटा अताशा दूरच्या क्षितिजा तळाशी
वाट पाहूनी अता मनपाखरे थकली, निमाली

------ आदित्य देवधर

Thursday, December 23, 2010

मोजदाद

भाग, बाकी आणि हातचे,
चिन्हांसंगे संपुन जावे
देणा-याने देउन जावे ,
घेणा-याने घेउन जावे !

पाण्यासंगे वाहून जावे
ओलाव्यापरी राहून जावे
पावसामध्ये धुंद होऊनी
कणाकणाने चिंब भिजावे

कधी फुलावे झाडांवरती
कधी मंदिरातुनी जळावे
कधी झुरावे चातकापरि
कधी कोकीळेसवे रमावे

मोजदाद का निव्वळ कोणी
करे नभाची अन रंगाची
आयुष्याच्या नभात केवळ
आनंदाचे रंग भरावे

ओलांडुन उंबरा जगाचा
स्मृतींतुनी हृदयात उरावे
मायाभूमीतली माणके
जाता जाता ठेउन जावे.

----- आदित्य देवधर

Tuesday, December 21, 2010

नभ रडवेले

सवय एवढी झाली की
अश्रू विसरे रडणे
घन बरसावे तैसे केवळ
आनंदाने पडणे

कधी कुणाला वाटे ना
पाउस हा रडवेला..
अंधा-या रातीला मजला
रडताना दिसलेला

भिजतो मीही आसवांतुनी
बरसातीच्या संगे
रडता रडता घेता येती
भिजणा-याची सोंगे

रडणा-या आभाळाचे मी
गातो हिरवे गाणे
पाउस येथे सांडत जातो
मोत्या एवढे दाणे

'का रडतो बा मुक्या नभा तू'
प्रश्न तया मी केला
विजेएवढा तडा केवढा
नभातुनी चमचमला

'धरणी माझी सखी एकली
कुणी प्रिया ना मजला
क्षितीजाच्याही पल्याड माझ्या
प्रिय सजणीचा बंगला'

'इतुके धावून जातो तेथे
प्रिया मीलनासाठी
तितुक्या तितुक्या लांबत जाती
प्रेमळ भेटीगाठी'

फुटून येतो बांध शेवटी
पाउस येतो धाउन
निघून जाते मळभ तेवढे
अश्रूंमधुनी वाहून

थेंब थेंब मग भेटून जातो
धरती होते ओली
भाव दाटती रम्य मनोहर
उत्कट सभोवताली

अता उमगले गुपीत सारे
ढगाळल्या गाण्याचे
भिजता भिजता रडण्याचे
अश्रूंच्या हसण्याचे

व्याकुळलेले डोळे गाती
गाणे हे भिजलेले
श्रावणमासी बरसून जाती
नभ ऐसे रडवेले

----आदित्य देवधर

असे कसे जमायचे

कधीतरीच भेटते, उगा मला अव्हेरते
अशातही रुसायचे, असे कसे जमायचे?
असे कसे जमायचे?

तुझीच वाट पाहतो, तुझेच चित्र काढतो
उद्या तरी दिसेल ती, मनास रोज सांगतो
अशीच चित्रं काढुनी स्वप्न रंगवायचे
कितीक दीस जायचे, असे कसे जमायचे

तुझी न ये कधीच हाक पत्र ही कधी न ये
घरासमोर वाट पाहतो तुझीच गे सये
चुकून ना कधीच मान वेळवोन जायचे
किती ग भाव खायचे असे कसे जमायचे

नवे नवे गुलाब फूल काय ऐक सांगते
'फुलून येत पाकळी पाखरू शहारते
मधाळ स्पर्श गंध धुंद एकरूप व्हायचे'
तरी तुझे रुसायचे, असे कसे जमायचे

दमेल रात्रही अता रुसेल चंद्र चांदणी
झोपतील तारका थंड रुक्ष या झणी
अता तरी पुरे सखे नको नको म्हणायचे
मला अता तुझ्यासवे रमायचे रमायचे

------आदित्य देवधर

Monday, December 6, 2010

त्रिवेणी

आलो होतो कशास इकडे, सुखे भोगण्यासाठी?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी?
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी?

कितीक  येतील लाटा आणिक विरून जातील
बरीच वाळू काठावरची घेउन जातील
नव्या ओलसर अस्तित्वाला ठेउन जातील

रोज सकाळी वाट पाहतो मावळतीची
रात्र जागतो स्वप्नांमधल्या अंधाराची
तरी वाट संपत नाही, की रात्र संपत नाही

दिसते मजला रूप तुझे तु इथे समोरी नसतानाही
कुठे हरवतो मी माझा स्वत:च, कारण नसतानाही
बघ, तुझ्याच पाशी असेन मी, तू रडतानाही हसतानाही !

-----आदित्य देवधर

Friday, December 3, 2010

आठवतो मज..

आठवतो मज, अलगद प्रेमळ हात थोपटे पाठीवरती
स्पर्श तयाचे उब तयाची स्वप्नांच्या गावी मज नेती
डोळे मिटुनी शांत झोपता शिळ मायाळू मधुवंती
घालून जातो  एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज, बोट धरोनी पाय चालती वाट नव्याने
उंच भरारी मारत जाती पंख कोवळे क्षणाक्षणाने
वाट आडवी उडता उडता, कुणी शिकारी उगा दमाने
खोड मोडतो एक विठोबा माझ्यासाठी, आठवतो मज

आठवते मज कुशी एक मायेची मजला लपण्यासाठी
ठेच लागता, दुखता खुपता घरी येउनी रडण्यासाठी
फुंकर घालून जखमेवरती केवळ माझ्या हसण्यासाठी
पाय चेपतो एक विठोबा माझ्यासाठी आठवतो मज.

----आदित्य देवधर

मी अन् तू

आरशामध्ये मजला दिसलो मी अन् तू ही
एकटाच मग अपुला हसलो मी अन् तू ही

रोजरोजच्या रडगाण्याना बळेच चाली
लावत जाता हसलो रडलो मी अन् तू ही

एकटे कधी वाटे हृदयी, डोळे मिटता
चेहरा तुझा पाहून फसलो मी अन् तू ही

सावली कधी पळून जाता क्षितिजावरती
सावली तुझी होऊन बसलो मी अन् तू ही

पाठीशी हा उभा तुझ्या मी अन् तू माझ्या
तसे एकटे  पुरून उरलो मी अन् तू ही

आता मजला तुझियावाचुन करमत नाही
दर्पणातले नाते झालो मी अन् तू ही

---- आदित्य देवधर

Friday, October 29, 2010

मनातल्या मनात

मनातल्या मनात पावसास वाटले
ढगास बोलवोन कोसळून टाकले
उद्या कधी मिळेल मोकळे वहावया
म्हणोन आजच्या पुरात धाय मोकले

मनातल्या मनात चांदणे शहारले
निवांत शांत मंद रातिला किनारले
टिपून चंद्र ओघळून येत चंद्रिका
मनात कोप-यात प्रेमभाव दाटले

मनातल्या मनात रंग धुंद होऊनी
प्रकाशती मिळून कोवळ्या फुलांतुनी
झणी उभारली अजोड रंगसंगती
घरी बहार आणली तयांस चोरुनी

मनातल्या मनात सांजवेळ नांदली
दिशादिशांमधून प्रीत तार छेडली
समस्त प्रांगणी मधूर सूर भारले
तुला उभी स्वत: समोर धुंद पाहिले

मनातल्या मनात सागरा तुझ्यासवे
निघून दूर जायचे, जगायचे नवे
बुडून जायचे असेच खोल आतुनी
बघायच्या नव्या दिशा नि चेहरे नवे

---- आदित्य देवधर

Thursday, October 28, 2010

तुला काय त्याचे

मनी लाविले मी दिवे अत्तराचे तुला काय त्याचे!!
काळीज वाती जाळून सरलो तुला काय त्याचे!!!

जरी थांबलो मी तुला भेटण्यासी तरी तू न आली
कधी सांजवेळी, कधी भर दुपारी, घराच्याच खाली
भले भेटण्याचे तसे खेळ झाले मनाशी मनाचे
तरी जीव माझा तुझ्यापास धावे तुला काय त्याचे!!

किती धाडली मी गुलाबी गुलाबी पत्रे लिहोनि
कोरून सारे जीवाचे शहारे रडोनी रडोनी
किती पाहिले मी स्वप्नी उतारे तुझ्या उत्तराचे
जरी जाणले मी नकारास तुझिया तुला काय त्याचे!!

उरी गाळली मी किती आसवे  गे मलाही न ठावे
रडली फुलेही , सुकले पिसारे , झुरले पुरावे
वाहून गेले डोक्यावरोनी पाणी पुराचे
तरी थांबलेलो गाळातळाशी तुला काय त्याचे!!

शब्दांस माझ्या किंमत दिली तू कवडी पुरेशी
स्वप्ने उशाशी ओल्या कडांनी निजली उपाशी
तुझिया स्मृतींचे तांडे निघाले ढळत्या घडीचे
मीही निघालो प्रेमा उपाशी तुला काय त्याचे!!

---आदित्य देवधर

जळमटं

हळू निनावी फुंकर आली, थरथरली जळमटं
'कुणा स्मृतींची लागण झाली', पुटपुटली जळमटं

पल्याड भिंतीशी विणता मी अलगद काही जाळी
नवीन शेजारी आल्याने खुसखुसली जळमटं

उगीच गप्पा टाकत होत्या काही जुनाट गोष्टी
अजून गाठी जोडत जाता बजबजली जळमटं

असे  वाटले झाडून घ्यावी जून स्मृतींची नाती
'कशास भ्यावे अस्तित्वाला?' ओरडली जळमटं

विझून जाता कोप-यातली पणती एक बिचारी
कशी एकटी पडली आणि अवघडली जळमटं

कितीकदा तू येऊन गेलीस येथे समोर माझ्या
तुझ्याचसाठी अंधारातून तडफडली जळमटं

अशीच ये अन् घेऊन जा तू उधार काही धागे
मला म्हणाली 'अताच सारी आवरली जळमटं'

------आदित्य देवधर

Wednesday, October 20, 2010

प्रेम हे असं असतं

प्रेम हे असं असतं.... असं असतं....
फार वेगळं काही नसून
मनातल्या मनातलं हसं असतं

पुराच्या पाण्यात झोकलेलं असतं
कुणाच्या स्वप्नात पोचलेलं असतं
डोळ्यांच्या वाटेनं बोलता बोलता
मनातलं गुपित जोखलेलं असतं

शब्दांच्या धारांत भिजलेलं असतं
चंद्राच्या कुशीत निजलेलं असतं
अंधाराचा पडदा पडता पडता
मिठीतून अंतर विझलेलं असतं

मनाच्या मातीत रुजलेलं असतं
लाजाळु लाजाळु बुजलेलं असतं
थोडीशी उन्हं जादा होता
कोप-यात लपून रुसलेलं असतं

उंच झोक्यावर बसलेलं असतं
मातीच्या गंधातून ठसलेलं असतं
पावसाची एक सर कोसळता
दव मनभर पडलेलं असतं

प्रेम हे नसतंच कधी स्वत:चं
आयुष्याचं ते निरांजन असतं
मायेच्या तेलाने चिंब भिजून
देवाच्या समोर जळायचं असतं

प्रेम हे असं असतं ..... असं असतं!

-------- आदित्य देवधर

Monday, October 18, 2010

बंदिवान

स्वातंत्र्याच्या आकाशातील मेघ बंदिवान मी
कोसळणा-या धारांच्यातील रेघ बंदिवान मी

पळता पळता अनोळखी वाटांच्या मागे इथे तिथे
अडखळत्या पायांच्यापाशी वेग बंदिवान मी

तू विरहाच्या चौकटीतुनी कोंडलीस वेदना 
लुसलुसणारी तारुण्याची शेंग बंदिवान मी

कितीक वर्षांनी दिसला मज तेजस्वी दिवा कुठे
उरात केली प्रकाशणारी भेग बंदिवान मी

अंतर राखून राहिलास तू प्रेमाच्या ओळींवरती
सोडूनिया हा समास झाले  रेघ बंदिवान मी

-------आदित्य देवधर

Friday, October 15, 2010

बघ तुला भेटायला कोण कोण आलय


बघ तुला भेटायला कोण कोण आलय
चेह-यावरचं सूत अगदी मऊ मऊ झालय

फक्त एवढे जाता जाता घेउन जा तू
हास्य  बापुडे केविलवाणे रडून आलय 

उगीच  दिसती अनोळखी चेहरे कितीसे
हिशेब सारे आता चुकते करून झालय 

इथे येउनी पहा जरासे सभोवताली
आनंदाच्या वाटेवर अश्रूंचे आलय 

चिंब केवढे ह्रदय दाटले तुझे अचानक
अशा कोणत्या आठवणीच्या तृषेत न्हालय? 

कोप-यातुनी उभी एकटी तिला पाहुनी
ऊर भरोनी काळजीतुनी उगाच भ्यालय!

आज शेवटी गुदमरलो मी फुलात राहून 
कधी एकदा  सरणावरती जातो, झालय.


-------आदित्य देवधर 

Wednesday, October 6, 2010

एक झाड

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

एक झाड मी होतो बहुधा माझ्या गेल्या जन्मी
किती झेलल्या गारा,  किती सोसली गर्मी
देत सावली उभा राहिलो येथे मरेपर्यंत
एक एक अवयव दिधले सरपण जमेपर्यंत
जळलो मीही तसा शेवटी एका साधुसंगे
राखेतूनही सोने घेण्या जमले कितीक भुंगे

देह जळाला तरी तेथला साधू संपला नव्हता
तेजाळ ओंजळीतुनी तेवढा तिथेच उरला होता
हात जोडूनी वदला सस्मित साधू नम्रपणाने
'भाग्य थोर लाभले केवढे तुझ्यासवे जळण्याने
मोक्ष गती प्राप्तीस साजसा कर्मयोग तू जगला
घे वर मागून वृक्षराजसा काय हवा तो तुजला'

समईने वातीस केवढा सन्मान दिला होता
जळण्याच्या संज्ञेस केवढा अर्थ दिला होता
माणूस होउन जगण्याच्या मग इच्छा दाटुन आल्या
नम्र झुकुनी साधूपुढती अशा मागण्या झाल्या
'एकदा तरी मनुष्य व्हावे असे करावे खास
छायेखाली बसुनी मजला घेता यावा श्वास'

जन्म अखेरी मला लाभला एका थोर कवीचा
शब्दांच्या सागरात डुबक्या मारून अवखळण्याचा
झाडे पाने फुले उतरली शब्दांमधुनी थेट
वेळोवेळी सृजनासंगे घडली त्याची भेट
जगला सारे आयुष्यातील आनंदाचे क्षण तो
अन् अचानक वरच्या दारी जाण्यास बुलावा येतो
अखेरच्या श्वासाची होती  एकाच इच्छा त्याची
छायेमध्ये झाडाखाली राम राम म्हणण्याची
सुचती त्याला काही ओळी जगास देण्यासाठी
येणा-यांनी  जाण्यासाठी, जाण्या-यांनी येण्यासाठी

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

------- आदित्य देवधर

Tuesday, October 5, 2010

भ्रम

फूल एक वाटेवरले, गळून गेले
बंध दोन धाग्यांमधले
, जळून गेले

यातना भ्रमाची हसली उगीच जेव्हा
दु:ख तेच हास्यातून विरघळून गेले

दार बंद होताच उद्याचे उजाडणारे
वादळी नशेचे संकट टळून गेले

पाय देत शब्दांवरती येता जाता
अर्थ मोकळ्या आभाळी मळून गेले

थोर चोर अध्यात्माची घेती शाळा
हेच शेवटी म्हातारे चळून गेले

घाव घालुनी पाठीवर फितूर गेले
रक्त केवढे कडवे भळभळून गेले

भावशून्य गाण्याच्या मैफिली जमवता
सूर आतले दु:खी कळवळून गेले

-----आदित्य देवधर

असावीस तू जवळी

पावसाचा पडदा छेडून लहरत येता वारा
लाटा अवखळ पडद्यावरती झिम्मा धरती न्यारा
तुषार भरती आनंदाची स्वप्नांमधली तळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

पुसती मजला थेंब थेंब हे कुठे हरवले रंग
इंद्रधनुही अवघडलेले, अजब तयाचे ढंग
रंगप्रभाही उतरू लागे
गात्र गात्र ओले अन जागे
कोकिळही मग गाउ लागे तृषार्त ओल्या गळी


एक एक थेंबावर मजला कितीक सुचती गाणी
शब्दांचाही पूर जाहता अडखळते हृद वाणी
ताल धरूनी पानांवरती
सूर वेचुनी गाउन जाती
कोमेजून रडवेल्या माझ्या स्मृतींतली हर कळी

ओघळते संदर्भ न जाणो कुठून येती दारी
सुंदर वळणे घेउन देती नवी नवी खुमारी
अशाच एका वळणावरती
आठवणीही वाट पाहती
कधी पडावी गालावरती गोड गुलाबी खळी
वाटे गुंफून जावे तुझिया हातांमधुनी गळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

-----आदित्य देवधर

Saturday, September 25, 2010

आनंदी क्षण


मातीत एक थेंब
पडताच दिला सांगावा
भारलेल्या चैतन्याचा
भविष्याच्या अस्तित्वाचा

डोळ्यांत एक थेंब
मिटलेल्या पापण्यात दडला
दडपण सरल्याची भावना
दाटून म्हणाली जरा थांब ना
असा ओघळू नको लगेच
थोडा धीर धर
तुला संधी मिळणार आहे
हासत हासत ओघळण्याची
तू हसताना येण्यासाठी
जन्माला आला आहेस
शेजारचं एक स्वप्न बघ
तिथेच वाढीला लागलंय
त्यालाही तुझी सोबत
आणि तुला त्याची
अस्तित्वाची सान्निध्याची

तू रुजायला लागशील
मिळेल ओजाचं पोषण
एक हिरवा अंकुर फुटेल
या अंकुराच्या दृष्टीने बघ जरा
सगळे तुला बघायला आतुर
हसून, उत्साहाने, चैतन्याने
त्यांच्या ठायीही तुला दिसेल
डोळ्यांत एक थेंब
आकार घेताना
आनंदी क्षणासाठी जन्माला आलेला

-------आदित्य देवधर

मालकीण

        आमच्या मालकीणबाई म्हणजे तसं फार मोठं प्रकरण! प्रगल्भ आणि तेवढंच गूढ. उदात्त आणि तेवढंच विक्षिप्त. कामाचा प्रचंड उरक आणि पुढच्या कामांसाठी सदैव तयार. फार मोठा पसारा सांभाळतात. म्हणजे मला जो माहीत आहे तो मोठाच म्हणावा लागेल. माझ्यासारख्या ब-याच जणांची जबाबदारी त्या लीलया पेलताहेत. म्हणा मला दुसरा काही पर्याय नाहीये पण अशा सगळ्यांनाच त्यांनी आपल्या छायेखाली आश्रय दिला आहे. स्वत:च्या आणि आमच्या कामांचा रगाडा हाकताहेत. रोज त्यांचा दरबार भरतो. आम्हाला कधी जावं लागत नाही तिथं, पण तिथेच सगळे हिशेब चालतात. त्यांचा एक हसबनीस  आहे. फार चतुर आणि कर्तबगार. त्याला सगळं येतं. तो सगळ्यांचा नियमाप्रमाणे चोख हिशेब ठेवत असतो. बिनचूक अगदी. बोट ठेवायला जागाच नाही कुठे.

       बाईंनी आम्हाला आमची कामं अगदी सुरुवातीपासूनच वाटून दिली आहेत. कामाप्रमाणे मोबदला मिळावा ही साधी अपेक्षा आहे की नाही? पण तसं होत नाही. त्यांच्या कारभाराविषयी मला फार माहिती नाही. पण जरा अगम्य आणि विचित्र आहे. मी थोडा शोधण्याचा प्रयत्न केला पण 'अपने बस की बात नही' हे कळल्यावर नाद सोडून दिला. मोबदला आणि काम यांचं गणित काही जुळत नाही. तो हसबनीस  काय करतो कुणास ठाउक. दाद मागायला गेल्यावर अशी काही समीकरणं मांडून दाखवतो की घेरीच यावी सोडवता सोडवता. तरी माझ्या एका मित्राने तसं प्रयत्न केला होता. पण समाधान न झाल्याने बिचारा तसाच राहिला. मोबदला तर दूरच अजून गाडाभर कामं मागे लावली.

        मला त्या फारशा आठवत नाहीत. कशा दिसतात कशा राहतात , माहीत नाही. पण त्यांची खूप रूपे असावीत. एवढी कर्तबगार प्रतिमा.. एक थोडच असणार आहे? मग मी त्यांना काळ्या डगल्यात, कधी श्वेत वस्त्रात कधी आईच्या रूपात तर कधी मायेच्या रूपात कल्पित करतो. त्यांना कधी बघायला मिळेल असं वाटत नाही. एकदाच कधीतरी फार पूर्वी त्यांना भेटल्याच पुसट आठवतंय. पण ते अगदी त्यांच्याकडे काम सुरु करण्यापुर्वी. बराच काळ लोटला आहे त्याला. मलाही आता सांगता येणार नाही. आमचा काय कामापुरता संबंध. कामं आली की ती संपवायची. दुसरी कामं तयारच असतात. यातून सुटका नाही. मला तर वाटतं की गेल्या आणि त्याआधीच्यांही जन्मांमध्ये हीच बाई असणार मालकीण म्हणून.

        परवा एक विलक्षण गोष्ट घडली. देवाकडे गेलेलो. ८० वर्षांनी गेलेलो. ब-याच गप्पा झाल्या. अन् अचानक तिथे दोन व्यक्ती आल्या. त्यांची बोलणी सुरु झाली देवाशी. त्यातली एक अत्यंत तेजस्वी स्त्री होती. आणि एक करारी पण अत्यंत वृद्ध असा पुरूष होता. मला उगाच आमच्या मालकीण बाईंची आणि त्या हसबनिसाची आठवण झाली. असेच दिसत असतील ते ..मी मनात म्हणालो.उगाच हसू आलं. रिकाम्या वेळी मनाचे घोडे कुठेही पळतात. असो. इतक्यात देवाने मला हाक मारली....
'वत्सा..... यांना भेट. यांच्याच सांगण्यावरून तुला पुढची कामगिरी देत आहे. बोलून घे एकदा'
मी चपापलो. माझी अवस्था ओळखून देव म्हणाला.
'तू ओळखत नाहीस? अरे ही नियती आणि हा निसर्ग.....!!! हीच तुझी मालकीण आहे आता.'

----- आदित्य देवधर

अस्तित्वाचे ऋतू

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती
मनीचे ऋतू बदलले किती

रंगांचाही जन्म इथे जाहला
असंख्य छाया , गूढ छटांचा अर्थ इथे लागला 
तेजामधुनी मिसळून जाती
हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या
हृदयामधल्या भरकटलेल्या अंधारातील गती
छटेचे ऋतू बदलले किती

रिमझिमती, धारा कोसळती 
आरशामध्ये अवघडलेल्या सरी धरेवर कोसळती
काळ्या चष्म्याआतून धारा
रंगीत  गाणी गाऊन जाती
कुणास स्मरती नाजूक साजूक ओघळती
सरींचे ऋतू बदलले किती

अस्तित्वाचे ऋतू बदलले किती
मनास पैलू पाडत जाती अभिव्यक्तीच्या मिती

------- आदित्य देवधर 

चुका

मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या
सह्या प्रशस्ती पत्रांवरती उगाच झाल्या अमुच्या

ओरडताना देठातून आवाज बिचारा बसला
बडवून एकच बाजू अमुचा डग्गा पुरता फुटला
मैफिली समेशी धडपडणा-या सुन्याच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

झिंग एवढी चढली की दिवस रात्र उमगेना
अस्तित्वाच्या ऋतूंबरोबर घासाघीस जमेना
तोल सावरता सावरता नशाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

पेल्यांमधुनी पिता पिता लाव्हाही डचमळला
उष्ण उष्ण वाफांच्या खाली कोणतरी तडफडला
कारण वणव्यालाही साध्या चुळाच झाल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

एक शूळ उमटला कोठे मातीत घराच्या अंगणी
उघड्या जखमा अंगावरती अंत:करणी दुखणी
दवा औषधी मर्दुमकीच्या पुचाट ठरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

धडधडणा-या हृदयामध्ये देव पाहिला आम्ही
लटपटणा-या पायांना आधार जाहलो आम्ही
अश्रद्धांचे श्राद्ध घालण्या मुठीच पुरल्या अमुच्या
मोजून मापून बिघडवणा-या चुकाच झाल्या अमुच्या

----- आदित्य देवधर

Friday, September 3, 2010

जगून घे

आता जरासे हसून घे
श्वासांस थोडे जगून घे

जाता निघोनी लवाजमा
मागून त्यांच्या रडून घे

मारे कुणीही फुशारक्या
कानास दारे करून घे

क्रांती जिथे पेटुनी उठे
ज्वालांत तेथे जळून घे

जाशी करायास सांत्वना
थोडे स्वत:चे करून घे

स्पर्धा कुणाची कुणासवे
मधल्या मध्ये सावरून घे

आता कितीसे जगायचे
पुन्हा नव्याने मरून घे

प्राणांस त्यागून शेवटी
वाटेल तैसे जगून घे

-----आदित्य देवधर

गोडवे गाऊ कुणाचे

गोडवे गाऊ कुणाचे, गीत आसुसल्या मनाचे

रेशमाच्या पालवीचे, गार हिरव्या सावलीचे
कोवळ्याशा सायलीचे, चाफयाच्या बाहुलीचे
मायभोळ्या माउलीचे, सोहळ्याच्या चाहुलीचे
देवळाच्या पायरीचे, धावणा-या शेवरीचे
शांतणा-या भैरवीचे, मुग्ध कर्णी बासरीचे
कोरलेल्या कोयरीचे, कुंकवाच्या सोयरीचे
पौर्णिमेच्या चांदण्याचे, ज्ञानगंगा वाहण्याचे
उंच उंची नारळीचे, सागराच्या मासळीचे
निर्झराच्या गारव्याचे, संधीकाली मारव्याचे
डोलणा-या केशराचे, कूजणा-या पाखराचे
गोडवे गाऊ कुणाचे खेळ सारे या मनाचे

मोकळ्या मऊ कुंतलाचे, गौरकांती सुंदराचे
नीलकमला डोळियांचे,अन गुलाबी पाकळ्यांचे
कर्ण भूषण लोलकांचे, शांत रेखीव काजळाचे
खळखळोनी हासण्याचे, वेळवोनी पाहण्याचे
काननी मृग चालण्याचे, कोकिळेच्या बोलण्याचे
डौलदार आलिंगनाचे, प्रेमस्पर्शी चुंबनाचे
वाट माझी पाहण्याचे, थेंब काही गाळण्याचे
भेटण्याच्या कळकळीचे, अंतरंगी धडधडीचे
थांबलेल्या क्षणभराचे, संपलेल्या अंतराचे
प्रेयसीच्या संगतीचे मोहवेड्या रंगतीचे
गीत धुंदी यौवनाचे, गोडवे माझ्या प्रियेचे

----- आदित्य देवधर

Tuesday, August 31, 2010

आनंद-पालखी

माझ्याच सावलीचे रे झाड लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

आयाम लाभले रे नवरूप चेतनेचे
दृष्टांत जाहले रे सृजनक्षम कवीचे
गाणे सुखावणारे हलकेच ऐकिते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

अमृत तेज लाभो ज्योतिर्मयी प्रकाशी
शक्ती उरी शिवाची लक्ष्मी वसे कराशी
दुर्गेस प्रार्थनेचा नैवेद्य दाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

बरसात धुंद होता न्हाऊन चिंब झाले
श्वासात ओजसाचे दैवी सुगंध आले
बागेतल्या कळ्यांशी लाडीक बोलते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

डोळे मिटून कल्पे हर एक त्या क्षणाला
आभास गोड मोठे ओवाळती स्वत:ला
मायेत चिंबलेली दिपमाळ लाविते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी

भिजताक्षणी फुटावी नवपालवी मनाला
हिरवे निळे उडावे रावे क्षणाक्षणाला
स्वप्ने अमूल्य काही स्वप्नात पाहते मी
आनंद-पालखीचे पदभार वाहिते मी


------- आदित्य देवधर

काय हे अमुचे जिणे!

रोज यंत्राच्या प्रमाणे मानवी कळ दाबणे
पावलीच्या चाकरीचे काय हे अमुचे जिणे!
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

रातिचे अवघे करोनी सोहळे, जलसे असे
चांदण्याचीही इथे जंगी निलामी होतसे
सूर्यही झाके स्वत:ला पाहुनी हे वागणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भोवतालीची अधाशी पाशवी वृत्ती सले
झापडा बांधून डोळा चालतो आम्ही भले
जाहले वणव्यातले अमुचे खुळे बुजगावणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

आसवांनो दूर व्हा डोळ्यांकडे फिरकू नका
ओघळायाचे भुलोनी आतुनी रडणे शिका
येतसे आम्हा गिळोनी आसवे अमुची पिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

सांत्वनाचे शब्द आम्ही चार मोठे जाणतो
टचकनी डोळ्यांतुनी पाणी पुरेसे आणतो
विकुनिया या भावनांना पळभरी कुरवाळणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

स्वार्थ केवळ राहिले येथे भल्या नात्यांतुनी
मित्र सारे शोधलेले फायद्याचे पाहुनी
साचली खाती पुरेशी, प्रेम मायेचे उणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

मूठभर ती माणसे होती जयांना भ्यायलो
मान तुकवोनी उभे आम्ही कडेशी राहिलो
घेतले शिक्षण अशा शाळेतुनी शिकलो भिणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

भूक होती पेरली येथे सुखाच्या भोवती
केवढी हाडे इथे नरकात पोटे जाळती
बापडे मश्गूल आम्ही येथ भरण्या बोकणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

'उडवतो गाड्या जराशा काय या अमुच्या चुका?
चोचले पुरवू जिभेचे भागवू अमुच्या भुका
काच खाली घेउनी देतो गरीबाला चणे'
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

वस्त्र लज्जा झाकण्या पुरते कुणा ना सापडे
मोजुनी पैसे हजारो होत कोणी नागडे
फाडती कपडे नव्याने 'ते जुने होते' म्हणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

एकही आवाज येईना जरी मी बोललो
आग पेटवण्या कधी ठिणगी इथे मी जाहलो
विझवुनी तिजला दिले हाती जुनेसे तुणतुणे
हाय हे अमुचे जिणे! काय हे अमुचे जिणे!

--------- आदित्य देवधर

Monday, August 30, 2010

पाउस येता....

येता पाउस दाटुनी तममयी आभाळ हो जाहिले 
मृद्गंधी दव न्हाउनी कवडसे क्षितिजावरी पाहिले
धारा कोसळूनी उडे चहुकडे आनंद हृदयातुनी
शालू नेसून गार गार हिरवा धरती सुखाने डुले

ओला चिंब झरा पडे उसळुनी खाली प्रपातातुनी
मोत्यांची बरसात झेलून कुणी नाचे तुषारांतुनी 
थेंबांच्या जणु आरशातुन बघे रंगीत नवसुंदरा 
नवलाई डवरून अंगावरी तेजाळ कांती फुले

गारा वेचुन डोलुनी मयुर हा शोभे विहंगाग्रणी 
वाटा काढुन धावती शतमुखी फेसाळ सा-याजणी 
नाजुक नाजुक पान पान थिरके वा-यास बोलावुनी
रत्नांचे कित्येक घड इथे लडिवाळ रेंगाळले 

धारांचा रचुनी सुरेल मुखडा मल्हार आरंभिला 
अस्मानी धून जादुई मदभरी छेडून नभ डोलला 
ताना घेउन वीज कडकडकडे थाटात षड्जावरी
टाळ्या वाजवुनी नभी गडगडे कुंभात जल सोहळे 

डोंगरवट कुरवाळती घन-धुके होई प्रभा धूसरी 
गालीचा मऊ रेशमी पसरला वाटे जणू भूवरी 
पडदा ओढुन थंडिचा लपतसे यौवन हिरवे निळे 
करती किलबिल पाखरे सभवती आनंदरस ओघळे

--------- आदित्य देवधर 

Wednesday, August 18, 2010

पानिपत

     
       विश्वास पाटील यांचं 'पानिपत' वाचलं. त्यावर काही लिहिल्याशिवाय रहावत नाही. कायमचा लागलेला डाग, सततची बोच, गेलेला विश्वास, झालेली हानी..!!! सगळं काही परत न मिळवता येण्यासारखं. पानिपत जनमानसात एवढं कोरलं गेलंय की पानिपत आणि  'वाताहात', 'दाणादाण' वगैरे शब्द समानार्थी वाटायला लागतात. 'पानिपत झालं' एवढ्यातच काय ते कळुन चुकतं. एखादी घटना, स्थळ एवढं रुजावं की वाक्प्रचारासारखं वापरलं जावं, ही काही साधी गोष्ट नव्हे. पानिपतला सदाशिवराव  काय एका महिन्यात हरले नाहीत, ती बरीच मोठी 'पुण्याई' होती. रघुनाथराव अटकेहून परतल्यानंतर पेशव्यांच्या दशा काही चांगल्या नसाव्यात. जरीपटका अटकेपार लहरून आला पण त्याने मिळालं काय तर कर्ज आणि अंतर्गत दुही. पराक्रम झाला खरा पण त्याचं सत्तेत रूपांतर झालं नाही. एवढा मोठा इतिहास घडवताना पेशवे राजनैतिक महत्वाकांक्षा दाखवण्यात कमी पडले, असं मला वाटतं. दिल्ली काबीज केल्यानंतर बाद्शाहापादाची सूत्रे हाती घ्यायच्या ऐवजी आम्हाला त्यांचे रक्षणकर्ते होण्यातच धन्यता वाटली. पानिपताची कारणे आणि परिणाम हा आपल्यासारख्यांसाठी एक धडा आहे. गेल्या कित्येक पिढ्या लोकं डोळ्यांच्या कडा ओलावून पानिपत सांगत आहेत, ऐकत आहेत. पानिपताचे  परिणाम आपण अजूनही भोगत आहोत . खरं तर या पराभवातून खूप शिकण्यासारखं आहे. किती शिकलो माहित नाही. काही कारणं, ज्याला घोडचुका म्हणता येईल, अशी काही नमूद करण्याचा माझ्या परीने केलेला प्रयत्न. 
         पानिपताच्या आधीच दिल्ली मराठ्यांच्या पायाशी लोळण घेत होती. तिथला बादशाहा फक्त बाद होणं बाकी होता. त्यावेळीच मीरबक्ष  नजीब आणि तमाम सुभेदारांना देहदंड करून किंवा मांडलिक होऊन राहण्याची आज्ञा करण्या ऐवजी मराठे तहास तयार झाले. मिळालेला मामुली मान, तूट भरून काढता येईल इतपतच खजिना आणि फुटकळ किताब आणि सुभेदारी याच्या मोहापायी त्या धूर्त नजीबाशी केलेला तह हा कुठल्याच राजकारणी मुत्सद्द्यास शोभणारा डावपेच नव्हता. त्याचवेळी रघुनाथरावांनी बादाशाहापादाची सूत्रे हाती घेउन तो नेहमी छत्रपतींच्या सेवेत राहील अशी हमी किंवा तरतूद केली असती तर काय बिशाद होती त्या पठाणांची की त्यांने हिंदुस्थान च्या दौलतीकडे डोळे वर करून बघावं! शिवाजी महाराजांची १०० वर्षांपूर्वीची ----' अटक ते कटक आणि काश्मीर ते सिंहल प्रांतापर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा '--- त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवली असती तर पेशवा फक्त पुणेरी उरला नसता तर हिंदवी झाला असता. हिंदुस्थानातील रहिवाशांचच या पवित्र भूमीवर राज्य उदयाला येताना दिसलं असतं.
        सगळं शौर्य, पराक्रम एका बाजूला आणि अंतर्गत कलह एका, अशा तराजूत कलहाचं पारडं जड झालेलच बघायला मिळेल. मराठ्यांच्या बाबतीत तर जास्तच. शिवाजी महाराजांनीही हे खूप भोगलं. तत्कालीन राजघराणी आणि सरदारांमध्ये असे बरेच कलह होते. हेवेदावे होते. त्यातूनच सुरु झालेल्या राजकारणी खेळ्यानी घात करायचा तो केलाच. पानिपत याला अपवाद नाही. अहो, आमचा शत्रू निदान धर्माच्या नावाखाली एकत्र येतो हो..!! आम्ही तर भाषा, प्रांत, धर्म या सगळ्याबाबतीत एकच  होतो. पण तरी निरनिराळ्या कारणांसाठी एकमेकांवर खार खात राहिलो. जात-पात, वर्ण भेद वारसा हक्क, सुभेदारी अशा नाना भांडणांनी मराठयांची भक्कम तटबंदी वेळोवेळी खिळखिळी केली आहे. त्यासाठी कुठली मुलुख-मैदान लागली नाही. इतर सरदारांपेक्षा आपलं महत्व जास्त असावं म्हणून काय काय कारस्थानं केली असतील! किती जीव अशा चढाओढी मुळे खर्ची पडले असतील!! होळकर जर वेळीच शिंद्यांच्या मदतीला गेले असते तर दत्ताजी सारखा मोहरा मराठ्यांना गमवावा लागला नसता.
        नजीबाने मराठ्यांची तत्कालीन राजनैतिक परिस्थिती योग्य ओळखली होती. थोरल्या बाजीरावांबरोबरीने घोडी उधळलेली सरदार मंडळी आता जुनी झाली आली होती. सैन्याचे लगाम आता नव्या दमाच्या रक्ताच्या हातात होते. अर्थात या बुजुर्ग मंडळींचे केस जरी पांढरे झाले असले तरी तरी तलवारीची रक्ताची तहान मात्र तशीच होती. परंतु वाटाघाटी आणि डावपेचातलं महत्व मात्र कमी झालं होतं. हे नेमकं हेरून नजीबानं मल्हारबाबांकडे आश्रय घेतला. अर्थात मल्हारराव त्याला सामील नव्हते. परंतु जिथे मुळात ज्याला ठेचायला हवा होता, त्याला दूध पाजणं चाललं होतं. इकडे मराठे नजीबाला धरण्यास राती जाळत होते, आणि नजीब मल्हाररावांबरोबर त्यांच्याच डे-यात भीक मागायचं नाटक खेळत होता. जर मल्हारराव त्याचे डाव हेरून त्याला जेरबंद करण्यात यशस्वी झाले असते, तर पुढचा इतिहास वेगळा झाला असता.
       अब्दाली दिल्ली जिंकायला परत येणार हे कळल्यावर रघुनाथ राव स्वत: उत्तरेकडे निघावायास हवे होते. पण तिथेही भाऊबंदकी नडली. तुलनेने कमी चढाया केलेले सदाशिवराव आणि कोवळा विश्वास यांच्यावर एवढी मोठी मोहीम सोडून रघुनाथराव पुण्यात गाद्या गरम करत बसले. एवढा शूर माणूस पण बायकोचा धूर्तपणा आणि सखाराम बापूंच्या लबाड पणामुळे त्यांनी तलवार म्यानात घातली. तीच जर पानिपतात तळपती, तर पानिपत पठाणांचे झाले असते आपले नाही. कर्तृत्व   युद्धात असो किंवा राजकीय कारभारात असो, मोल कमीजास्त याने ठरत नसतं. पण कारभा-यांनी युद्धात हिशेब मांडणं किंवा शूर सेनापतीने दप्तरीत जमाखर्चाचा ताळमेळ घालणं याला कुठला न्याय समजावा?
       सदाशिवराव मोठ्या फौजफाट्यासह उत्तरेच्या मोहिमेवर निघाले. फक्त फौज नाही तर निम्मं पुणं घेऊन निघाले. बाया-बायका, त्यांचे दास दासी व नातेवाईक , यात्रेकरू, ब्राह्मण, कितीतरी भाट आणि हुजरे असे कितीतरी. एवढा लवाजमा घेऊन जायची गरज ती काय. यांच्या सुरक्षेविषयी थोडाही विचार डोक्यात  आला नाही?. जरी 'खाशा' नी हट्ट केला तरी योग्य-अयोग्य उमजून पावलं उचलायला नको होती का पेशव्यांनी? राज्य चालवायला शिरावर घेतलेली जबाबदारी अशा हट्टापायी विसरायची? यामुळे झालं असं की आपला पडाव योजनेच्या मानानं दोन दोन महिने उशिरा पडायला लागला. चार महिन्यांची मोहीम ८-९ महिने लांबली. हा वाढलेला खर्च कुठून भरून काढणार होते? लुटून? तेच करावं लागलं शेवटी. मूळ उद्देश बाजूला ठेउन लूट करायाला गेलो आहोत आम्ही असा झालं. चुकलंच पेशव्यांचं!
       जर सदाशिवराव आणि तमाम दिग्गज आपलं हेर खातं चोख राखते, तर कदाचित युद्ध पानिपतात झालंच नसतं. दिल्लीजवळ अब्दाली यांच्या पापण्यां खालून अलगद आपलं सैन्य घेऊन अलीकडे येतो आणि आम्हाला काळातच नाही. कळतं ते समोर आल्यावरच! शिवाजी महाराजांनी ज्या हेर खात्यामुळे कित्येक कठीण प्रसंगी बाजी मारली आहे,शत्रूला हातावर तुरी दिली आहे ते खातेच मुळी नव्हते इथे! ऐनवेळी समोर आलेला शत्रू पाहून देखील एक वेळ अशी होती की आपण जिंकलो असतो पण नियतीला हे मंजूर नव्हतं. तिथेही आपण आपल्याच लोकाना नीचा दाखवायला गेलो आणि घात झाला. इब्राहीम गार्दीच्या तोफा अब्दालीची अक्षरश: चाळण उड़वत होत्या. पण गार्द्याला मदत करण्याऐवजी आपले काही शहाणे सरदार मधेच उभे ठाकले. शत्रु कोण अणि मित्र कोण अशी परिस्थिती असताना मित्रच शत्रु म्हणून समोर आला. तोफा शांत करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे अब्दालीने डाव साधला. त्याच्या तोफा धडाडल्या आणि अवघ्या काही घटिकात मराठ्यांना  पळता भुई थोड़ी  केली. पठाणांनी झाडून सगळ्यांना कापला(जे पळून आले त्यांचा अपवाद सोडून). हिरवे झेंडे फडकवून, भाल्याच्या टोकावर मुंडकी नाचवून हिंसेचा नंगा नाच केला पठाणांनी. कोणालाही सोडलं नाही. नाव, पैसा, वेळ, ताकद, मुलूख सगळं धुळीत मिळालं. पुणं तेव्हा खूप भेसूर रडलं असेल.एक एक किंकाळी घराघरातून घुमली असेल. एक एक वीट हादरली असेल.
          एवढं सगळं होउनही आपण यातून शिकत नाही. राजकारणी सोडा हो पण अगदी तुमच्या आमच्या सारखी सामान्य लोकंही पुन्हा पुन्हां त्याच चुका करतो आहोत. वर दिलेली आणि अशी अजूनही कारणं असतील यामागे. मी केवळ एक पुस्तक वाचून केलेला हा उहापोह कोणाला चुकीचा वाटू शकतो. याला इतर आयामही असू शकतात. पण ही  कारणं  मात्र चुकीची नाहीत. आणि ती समजून आणि सुधारून आपण अजूनही काही घरगुती, कौटुंबिक, सामाजिक पानिपतं टाळू शकतो असं  मला वाटतं.



(कोणास काही गैर वाटल्यास दिलगीर आहे. तपशील चुकीचा असल्यास जरूर कळवावे.)

------आदित्य देवधर

Thursday, August 12, 2010

निराशा

आटला आहे किनारा आटली हर एक आशा
मृगजळाच्या संगतीने राहतो आहे अताशा
 
बोचल्या कित्येक राती टोचली कित्येक नाती
पाहुनी खपली कुठेशी हासती जखमा जराशा
 
सोहळेही काय होते साजरे जे काय झाले
भाकरी कोंडा गिळूनी वाजला फुटकाच ताशा
 
खोल अंधारी तळाशी एकदा मज हाक आली
नाव मी पुसता तिला हसुनी म्हणाली 'मी निराशा'
 
दोर बांधूनी गळी मी नाचलो सांगेल तैसा
ओळखीचे चेहरे होते तिथे बघण्या तमाशा
 
-----आदित्य देवधर

Tuesday, July 20, 2010

आहुती

हसली शलाका आभाळ भरून
वारं  गार गार  परते फिरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

तहान थिजून अडके घशात
थंडगार चूल घरात घरात
नजर भकास आसवे गिळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

उपाशीच श्वास उपाशी कपास
कोरडा कोरडा उपाशी प्रवास
उपाशी धरती रडते बघून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

फुलातून मध मिळेना चाखाया
पानेही लागली मरून पडाया
झाड झाड उभे गळून गळून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

पाखरं किंकाळी फोडून रडती
दिशा स्तब्ध सा-या हेलावून जाती
ढगासही वाटे फुटावे वरून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

माय माझी माती अताशा थकली
भूक अनावर होउन फाटली
दिसे कलेवर भेगाभेगातून
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

आहुती यज्ञात माणसांची माझ्या
अभिषेक केला आसवांनी माझ्या
वणवा बळींचा पाहतो तुटून
थकलेलं पाणी डोळ्यांत भरून
वाट पाहतो बा पावसा पावसा
उरलेलं पाणी डोळ्यांत भरून

-------- आदित्य देवधर